पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार.

इमेज
नवी दिल्ली ,  30 : युवा लेखक प्रणव सखदेव यांना  ‘ काळेकरडे स्ट्रोक्स ’  या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा  ‘ साहित्य अकादमी युवा पुरस्कार ’  जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष 2021 च्या युवा पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील  २२  प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी युवा  पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली. प्रणव सखदेव   ;  मराठीतील आघाडीचे तरुण लेखक प्रणव सखदेव हे मराठी भाषेतील आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रसिध्द नाव आहे.  ‘ पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता ’  हा कवितासंग्रह , ' निळ्या दाताची दंतकथा ’, ‘ नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य '  हे कथासंग्रह ,  व  ‘ काळेकरडे स्ट्रोक्स ', ‘ 96 मेट्रोमॉल ’  या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केले असून ते मराठी प्रकाशन क्ष...

31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 साधेपणाने साजरे करण्याचे प्रशासनाचे आवाहन.

गडचिरोली , दि. 30 :  कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये  " ओमिक्रॉन "  ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/ रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठया प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेंबर 2021 ( वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाचे शासन परिपत्रकान्वये पुढील मार्गदशक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2021 रोजी व दि. 1 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे  स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. तसेच 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर  2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्...

तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी) पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुलाखतीचे आयोजन.

गडचिरोली ,  दि. 30 :  अन्न ,  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ,  मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय ,  दिनांक 28 जानेवारी 2021 व "सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ वितरित करणे" या योजनेच्या अमलबजावणीसाठी सचिव ,  अन्न ,  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 13 जुलै 2021 रोजी आयोजित बैठकीमधील दिलेल्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर तांत्रिक सहाय्यक हे एक पद कंत्राटी तत्त्वावर अस्थायी स्वरुपात मुलाखतीद्वारे भरावयाचे आहे. त्याकरीता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पदाकरीता शैक्षणिक पात्रता मानधन प्रतिमाह रु.30 , 000/- असून शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठ  B.Tech Food Technology  किंवा  M.Sc.Nutrition. ,  संगणकाचे ज्ञान आवश्यक  MS-CIT ( शासनमान्य प्रमाणपत्र) ,  मराठी भाषेचे ज्ञान ,  अन्न प्रक्रिया विभागाबाबत अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 12 जानेवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय ,  गडचिरोली येथी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद.

गडचिरोली ,दि. 30 :   महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा ,  संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,  गडचिरोली तथा जिल्हा क्रीडा परिषद ,  गडचिरोलीच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांचे मार्गदर्शनात जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे . सदर ऑनलाईन युवा महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यातून स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .  यावेळी परिक्षक व अतिथी म्हणुन संजय धात्रक ,   प्रशांत म्हश्याखेत्री व श्रीमती अश्विनी भोयर उपस्थित होते .  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आयुक्त ,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,  महाराष्ट्र राज्य ,  पुणे यांचे सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये सदर युवा महोत्सव  ऑ नलाईन पद्धतीने घेण्यात आला .  सदर महोत्सवात लोकनृत्य व लोकगीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .  सदर स्पर्धेत लोकनृत्य  या  स्पर्धेत  अनुप  डान्स  ग्रुप ,  सिमुलतला  ( घोट )  ता . चामोर्शी जि . गडचिरोलीच्या स्पर्धकांने प्रथम क्रमांक प्राप्त...

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी संकेतस्थळ सुरु.

इमेज
गडचिरोली ,दि. 30 :  अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेचा लाभ  घेण्यासाठी  विद्यार्थ्यास  विभागाच्या  https://mahadbtmahait.gov.in   या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सन 2021-22 मध्ये प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. महाडीबीटी संगणकीय प्रणालीत सन 2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज नुतनीकरणासाठी दि.4 जानेवारी 2022 व नवीन अर्ज भरण्यासाठी दि.9 जानेवारी 2022 अंतिम मुदत शासनातर्फे देण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना, अर्ज करण्याची निकष व अटी सदर संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेले आहे. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, ...

पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२१.

इमेज
गडचिरोली , दि. 30 :   शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण याची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य ,  विभाग ,  जिल्हा व तालुका पातळीवर पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  रब्बी  हंगामासाठी  रब्बी  ज्वारी ,  गहू ,  हरभरा ,  करडई,   जवस ,  तीळ ६ पिकांचा समावेश समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान १० आर (0.10 हेक्‍टर)  क्षेत्र आवश्यक आहे. तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र १०००    हेक्टर हून अधिक आहे अशा सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी रुपये  300  प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवर वरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा ,  विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केल...

अवघ्या 2 तासात होणारा बालविवाह थांबविला .... जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन,पोलीस स्टेशन गडचिरोली यांची कार्यवाही.

इमेज
गडचिरोली ,  दि. 29 :   आज गडचिरोली जिल्ह्यापासून अगदी  10  किमी अंतर असलेल्या पोर्ला या ठिकाणी सकाळी  11  वाजता एक बालविवाह होणार आहे अशी गोपनीय माहिती सकाळी  8  वाजता मिळाली. लगेच  जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता पोर्ला गाव गाठले. बालकाची जन्म पुरावा तपासणी करून ,  बालक  18  वर्षखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच लग्न घरी वर पक्ष व वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्यानुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली. वर पक्ष हे राहणार आसेगाव  तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील असून त्यांना विवाह न करता रिकामे हाथ जाण्याची वेळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने आणली. मुलींच्या वडिलांकडून मुलीचे  18  वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले. सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अवि...

राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यात कर्ज पूरवठा वाढवावा- जिल्हाधिकारी बँकांच्या समन्वय सभेत दिले निर्देश.

इमेज
गडचिरोली ,  दि. 29 :    गडचिरोली जिल्ह्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी बँकांनी नागरिकांना कर्ज वाटप वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समन्वय समिती संजय मीणा यांनी दिली. सर्व बँकांच्या तिमाही बैठकीत बँकिंग क्षेत्रातील विविध विषयावर जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्ह्यातील गरज ओळखून शेती ,  उद्योग तसेच लघू उद्योग व्यवसाय अशा क्षेत्रामधल्या कर्जपुरवठा  होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आरबीआयने निर्धारीत केलेल्या सूचनांनुसार जमा रकमेच्या प्रमाणात कर्जपुरवठा होणे आवश्यक असून येत्या काळात प्रत्येक बँकेने आपले कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट  वाढवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी ,  जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक युवराज टेंभुर्णे तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात वाढ करण्यासाठी गरजूंना कर्जवाटप केल्यास त्यातून इतरही व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक बँकेने आपला प्रमुख उद्देश हा कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करणे हा असला...

दिनांक: 29 डिसेंबर 2021गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतात पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला सूचना द्यावी.

गडचिरोली ,  दि. 29 :    दिनांक   २७   व   २८   डिसेंबर   २०२१   रोजी   राज्यात   काही   ठिकाणी   गारपीट ,  अवेळी   पाऊस   यामुळे   खरीप   हंगामातील   उभ्या   असलेल्या   तूर   कापूस   तर   काही   प्रमाणात   काढणी    झालेल्या   तुरीचे   नुकसान   झाले   आहे .   त्याचबरोबर   रब्बी   हंगामात   विमा   संरक्षित   गहू ,  हरभरा ,  रब्बी   ज्वारी   यासारख्या   पिकांचे   देखील   नुकसान   झाले   आहे .  याबाबत   अधिसूचित   महसूल   मंडळातील   विमाधारक   शेतकऱ्यांनी   संबंधित   विमा   कंपनीस   घटना   घडल्यापासून   ७२   तासाच्या   आत   नुकसानीबाबत   सूचना   देणे आवश्यक   असल्यामुळे ,   याबाबतची   पूर्वसूचना (intimation)  आपल्या   संबंधित   विमा   कंपनी ...

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमां संदर्भातगृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी.

मुंबई ,  दि. २९ : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन  विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर ,  २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर ,  २०२१ रोजी व दि. १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे.  राज्यात  २५ डिसेंबर पासून रात्री ९:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे. कोवीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ३१ डिसेंबर ,  २०२१ व नूतन वर्ष ,  २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्य...

बचतगटांच्या उत्पादनांना ‘माविम’ देणार ऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठ- महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर.

इमेज
मुंबई ,  दि. 29: बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असून ,  महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. ई- मार्केटिंगमध्ये महिला कमी पडू नयेत ,  यासाठी बचतगटाच्या उत्पादनांना माविममार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे ,  असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. माविम अंतर्गत बचतगटामार्फत तयार होणाऱ्या वस्तूच्या विक्री व प्रदर्शनबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे ,  ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी ,  उपसचिव विलास ठाकूर आदी उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या ,  ‘माविम’अंतर्गत बचतगटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी नव माध्यमांचा वापर करावा. यासाठी बचतगटातील महिलांना पॅकेजिंग ,  ब्रँडिंग ,  मार्केटींग याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटातील महिलांचा त्यांच्या उत्पादनाची माहिती देणारा व्हिडिओ तयार करुन तो ऑनलाइन माध्...

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ.

इमेज
ग डचिरोली , दि.2 8  : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही.अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन ,  निवास ,  शेणिक साहित्य ,  निर्वाह भत्ता आदिआवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार  संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना  सुरु केलेली आहे. शासन निर्णय दि   .१३ जून २०१८ च्या सुधारीत तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ  देण्यात येतो. कोरोनामुळे २०२०-२१ मध्ये सर्व महाविद्यालये बंद होती. शिक्षण ऑनलाईन सुरु होते अशा विद्याथ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ द्यायचा किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला असून  विद्यार्थ्यांकडून अर्जच भरुन घेतले नव्हते. कारण या योजनेसाठी ७५ टक्के उपस्थिती ग्राह्य धरली जाते. नुकतीच  ही अडचण शासनामार्फत दूर करण्यात आली असून ऑनलाईन शिक्षण असले तरी विद्याथ्यांची ऑनलाईन ॐ टक...

3 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.

इमेज
गडचिरोली , दि.28  :  सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात. सोमवार दि. 3 जानेवारी  202 2 रोजी दुपारी  3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ,  गडचिरोली  येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक जोडून ( प्रपत्र -1 अ ते 1 ड )  दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल.  तसेच तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ  सकाळी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. सदर लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालने व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील.

गडचिरोली जिल्ह्यातील ५ नगरपंचायती मधील प्रभागनिहाय आरक्षित जागा अनारक्षित आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता.

गडचिरोली ,  दि.2 8  :  राज्य निवडणूक आयोगाच्या  तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र. करीता  आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आलेल्या असून अशा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 5 नगरपंचायतीमधील सदस्य पदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम 2021-22 जाहिर करण्यात आले असून नगरपंचायतीमधील नागरीकाचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला महिला ऐवजी सर्वसाधारण/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता प्रदान केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या नगरपंचायतींमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला ऐवजी सर्वसाधारण/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील झालेल्या बदलाबाबत तसेच प्रभागनिहाय आरक्षणबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे. तसेच विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांच्या दिनांक 27 डिसेंबर 2021 च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी/सिरोंचा/चामोर्शी/धानोरा/ कुरखेडा या 5 नगरपंचायतींमधील सद...

जळगाव जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचारा संदर्भात पूर्ण चौकशी करणार - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू.

इमेज
मुंबई , दि.28 : जळगाव जिल्ह्यात  शालेय शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून संबधित शिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई  केली असून त्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. विधानपरिषद सदस्य किशोर दराडे यांनी जळगाव जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून सन  २०१५ ते २०१९  या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आला आहे याबाबत शासनाकडून संबधितावर कोणती कारवाई केली याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. चर्चेत सदस्य ॲड. मनीषा कायंदे यांनीही सहभाग घेतला. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले ,  जळगाव जिल्ह्यातील  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शालार्थ क्रमांक देण्यामध्ये झालेल्या अनियमिततेच्या चौकशीबाबतीत समिती गठित करण्यात आली आहे. तसेच नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट केलेल्या ३६४ प्रकरणांच्या नस्त्या चौकशी समितीकडे जमा केलेल्या आहेत. तसेच या प्रकरणातील शिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद केलेला असून त्यांच्यावर निलंबनाची कारव...

आरोग्य सेवा अधिक बळकट करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे.

इमेज
मुंबई ,  दि. 28: राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती , नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे , अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे  यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित  उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.त्यांनी सांगितले की ,   सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू आहे.शंभर टक्के रिक्त जागा भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे.  त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ञांच्या ८३३५ जागांपैकी ७९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. ३३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी २६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मा...

वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार - वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

इमेज
मुंबई ,  दि. 28 : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले ,  कडेगाव-पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती सन  २०१४ मध्ये झाली असून कडेगाव-पलुस वनपरिक्षेत्राचे एकूण क्षेत्र २६७५.१० हे. इतके आहे. कडेगाव वनपरिक्षेत्रात एकूण ३ वन परिमंडळ व ५ नियत क्षेत्राचा समावेश आहे. बेकायदा वृक्षतोडीस चाप बसावा ,  म्हणून कडेगाव-पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.मागील ३ वर्षात अवैध वृक्षतोडीचा १ वनगुन्हा निदर्शनास आला आहे. यामध्ये फॉरेस्ट सर्वे क्रमांक ११६ मधील ग्लिरिसिडिया या प्रजातीच्या वृक्षाच्या ५ वृक्षांना क्षती पोहोचविणेबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच माहे नोव्हेंबर २०२१ मध्ये मालकी क्षेत्रात वृक्षतोडीच्या एका घट...

विधानपरिषदेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप.

इमेज
मुंबई ,  दि. 27 : विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या विधानपरिषदेतील सदस्य सर्वश्री रामदास कदम ,  अमरीश पटेल ,  सतेज पाटील ,  अशोक उर्फ भाई जगताप ,  गोपिकिशन बाजोरिया ,  अरुणकाका जगताप ,  प्रशांत परिचारक ,  गिरिशचंद्र व्यास ,  यांना विधानपरिषदेत निरोप देण्यात आला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले ,  रामदास कदम यांची राजकीय कारर्कीद पाहताना कोकणातील जनतेविषयी त्यांना असलेले प्रेम दिसले. कोकणातील जनतेची कामे त्यांनी जबाबदारीने पार पाडली. पक्षाने दिलेली जबाबदारी ही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदस्य भाई जगताप एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. तसेच प्रत्येक विषयावर त्यांची भूमिका ते ठामपणे मांडतात. गिरिशचंद्र व्यास हे ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभागृहाची परंपरा ,  संस्कृती जपत सर्वांनी आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांचा वैचारिक ठेवा त्यांनी या सभागृहाला दिला आहे ,  असेही श्री.निंबाळकर यांनी सांगितले. विधान परिषद सभागृहात येणारा प्रत्येक सदस्य या सभागृहासोबत एकरुप होऊन जातो. परस्परांम...

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला विधानसभेत शिफारस करण्याचा ठराव.

मुंबई, दि. 27 : इतर मागास वर्गातील व्यक्तींना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका इतर मागास वर्गातील व्यक्तींना वगळून घेण्यात येऊ नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याचा ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. या ठरावास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन देऊन एकमताने हा ठराव पारीत करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्यादृष्टीने प्रक्रिया सुरु केली. मात्र राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेवू नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याबाबतचा ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. तो सर्वपक्षीय सहमतीने एकमताने पारित करण्यात आला. विधानपरिषदेत हा ठराव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडला ,  तोही सर्वपक्षीय सहमतीने एकमताने पारित करण्यात आला. राज्यातील ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला ओबीसी आरक्षणासाठी मागासव...

अखेर नागेपल्ली, ग्राम पंचायतीला लाभले स्थायी ग्राम विकास अधिकारी, सरपंच व सदस्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

इमेज
अहेरी :- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नागेपल्ली ग्राम पंचायत ही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्राम पंचायत असुन दररोज दुरवरून विविध कामासाठी येणाऱ्या लोकांची वरदड खुप असते. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून या ग्राम पंचायतीचा कारभार हा प्रभारी ग्राम सेवकांच्या हाती होते. या ग्रामपंचायतीला स्थायी ग्राम सेवक नसल्या कारणाने अनेक लोकांचे कामे रेंगाळत होती. त्यामुळे लोकांना भरपुर त्रास सहन कराव  लागत होते. याबाबतीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, अहेरी यांचे मार्फत  जि. प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्थायी ग्राम विकास अधिकारी देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.  या निवेदनाची दखल घेऊन शेवटी पदोन्नतीने श्री. एल. बी. वाडके स्थायी ग्राम विकास अधिकारी, म्हणुन  रुजु झाले असता नागेपल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच श्री लक्ष्मण कोडापे, उपसरपंच श्री रमेश शानगोंडावर व  इतर ग्रा. प सदस्य यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थायी ग्राम विकास अधिकारी लाभल्याने लोकांची समस्या कमी होऊन विकास कामांना गती येणार व सर्व प्रशासकीय कामे सुरळ...

अवकाळी पाऊस, गारपीट, वज्राघात संदर्भाने उचित सतर्कता बाळगणेबाबत सावधानतेचा इशारा.

गडचिरोली ,  दि.27:  भारतीय हवामान विभाग ,  नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात दि.२८ ते ३० डिसेंबर ,  २०२१ या कालावधीत अवकाळी पाऊस ,  गारपीट ,  वज्राघात इत्यादी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. विशेषत: जिल्हा मार्केट फेडरेशन ,  कृषि विभाग ,  पुरवठा विभाग व महसूल विभागाने प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून उचित खबरदारी बाळगावी. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी धान्यांची उचित काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

बैलगाडी शर्यत (शंकरपट) करीता शासनाची सशर्त परवानगी.

इमेज
किमान 15 दिवस आधी आवश्यक कागदपत्रासह जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक गडचिरोली ,  दि.27:  महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 21 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यात बैलगाडी शर्यत ( शंकरपट) आयोजन करण्यात विहित अटी व शर्तीच्या अधिन राहुन सुरु करण्यास परवानगी प्रदान केली आहे. सदर शर्यतीचे आयोजन करतांना प्राण्यांना कृरतेने वागविल्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये विहीत करण्यात आलेल्या नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. बैलगाडी शर्यतीचे आयोजन करु इच्छिणाऱ्या आयोजकास किमान 15 दिवस आधी आवश्यक कागदपत्रासह विहीत नमुण्यात व रुपये 50,000/- इतक्या प्रतीभुती ठेवीसह जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शर्यतीमध्ये सहभाग घेण्यासाठी गाडीवन म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभाग घेऊ इच्छिणारा कोणताही गाडीवान म्हणून ओळखीबाबतचा पुरावा आणि बैल व वळु यांचे छायाचित्रासह 48 तास आधी शर्यत आयोजकाकडे विहीत नमुण्यात अर्ज करण्यास बांधील राहील. सोबत नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायका कडुन बैलाची /वळुजी तपासणी करुन ते निरोगी असल्याचे प्...

जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन - 2021-22.

गडचिरोली ,  दि.27:   महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा ,  संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,  गडचिरोली तथा जिल्हा क्रीडा परिषद ,  गडचिरोलीच्या वतीने जिल्हास्तरीय  युवा  महोत्सवाचे  आयोजन  दि.  30  डिसेंबर  2021  रोजी  सकाळी  11.00  वाजताऑनलाईन / Virtual  पध्दतीने करण्यात येणार आहे. युवा महोत्सवातील वैयक्तिक स्पर्धा बाबी पुढील प्रमाणे, लोकनृत्य -  20  कलाकार,लोकगीत -  10  कलाकार तरी गडचिरोली जिल्हयातील  15  ते  29  वर्ष वयोगटातील कलावंतांनी आपले अर्ज दि.  29  डिसेंबर  2021  रोजी दुपारी  3.00  वाजेपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,  गडचिरोली येथे सहभागी स्पर्धकांचे नाव ,  जन्म तारीख व जन्म तारखेचा पुराव्यनिशी सादर करावे ,  स्पर्धेच्या अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा  Covid 19  रोगाच्या संदर्भात शासनाच्या सुचनांचे पालन करावे.असे श्र...

डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली.

इमेज
गडचिरोली ,  दि.27:   शिक्षण महर्षी आणि कृषि क्रांतीचे प्रणेते   डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख  जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले .  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, श्री.चहांदे, उमाकांत चतुर, जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले, आदी उपस्थित होते .  उपस्थित  सर्व  अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले .

जंगल कामगार सहकारी संस्थांना कुपाचे वाटप.

इमेज
गडचिरोली ,  दि.27:  सन  १९४७   साली तत्कालीन  मुं बई राज्याचे  मुख्यमंत्री  कै.  बाळासाहेब  खेर  यांनी  जंगल  मक्तेदाराकडून आदिवासी समाजाची होणारी पिळवणुक व शोषण थांबावे ,  त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. आदिवासी  समाजातून  नेतृत्व  निर्माण  होवून  या  समा जाला मानवतेची वागणूक मिळा वी  व त्यांचे करवी   समाजाच्या उध्दाराचे कार्य व्हा वे ,  या करीता शासनाने घोरणात्मक दृष्टीकोणातून जंगल कामगार सहकारी   संस्था चळ व ळीचा स्विकार केला आहे. स द्या स्थितीत गडचिरोली जिल्हयात  २६   संस्था कार्यरत आहेत. या   संस्थांना वनविभागाचे कार्य   आयोजनेत समाविष्ट असलेली कुपे तोडीस पाटप करण्यात येतात. त्यापासून   संस्थांचे सभासदांना रोजगाराच्या   संधी उपलब्ध होवून त्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत होते. गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत  व नविभाग आलापल्ली व वडसा या वनविभागात  मं जुर   कार्य   आयोजनेनुसार तोडीस  योग्य  असलेली   ...

कोरोना -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेच - संजय मीना.

इमेज
जिल्हाधिकारी यांचेकडून आवश्यक अतिरीक्त निर्बंध लागू गडचिरोली , दि.27:   राज्यात वाढत्या ओमिक्रॉन कोविड विषाणूच्या अनुषंगाने त्यावरती नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी आवश्यक अतिरीक्त निर्बंध आज जिल्हयात लागू केले. कोरोना -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेच असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हयातील बंदीस्त जागेमध्ये आयोजित होणारे सर्व कार्यक्रम जसे- विवाहसमारंभ ,  लग्नसोहळे ,  वाढदिवस सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजित करतांना जागेच्या आसन क्षतमेच्या कमाल 100 नागरिकांचे उपस्थितीस मर्यादा असेल. तसेच सदर कार्यक्रम मोकळया जागेत आयोजित करतांना कमाल 250 उपस्थिती किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 25% यांपैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी असेल. जिल्हयातील सामाजिक ,  राजकीय ,  धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना बंदीस्त जागेकरिता 100 व मोकळया जागेकरिता 250 किंवा जागेच्या क्षमतेच्या 25%  यांपैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीतांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. वर नमुद केलेल...

आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गोलाकर्जी-छल्लेवाडा वळणावर दोन मोटर सायकल मध्ये झाले अपघात.

इमेज
प्रतिनिधी- पवन दोंतुलवार अहेरी :- आज दि-२५/१२/२०२१ रोजी आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गोलाकर्जी - छल्लेवाडा मध्यंतरी वळणावर दोन मोटर सायकल मध्ये जबर धडक झाले. सदर अपघातात मोटरसायकल क्र-एम.एच-३३ ए-१५०६ ने अर्कापल्ली येथील श्री दिनेश आत्राम वय-२४, श्री रामशाई सोयाम वय-६५ व श्री नागअर्जुन आत्राम वय-१२ याला गुन्डेपल्ली शाळेत घेऊन जात होते. तर विरुद्ध दिशेने एटापल्ली येथील श्री अरुण तेलकुंटावार आपल्या मोटरसायकल क्र- एम.एच -३३-ए-२३७० ने सिरोंचा जात होते. तेव्हा छल्लेवाडा वळणावर दोन्ही मोटरसायकल मध्ये जबर धडक बसुन अपघात झाले. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजय कंकडालवार हे  सिरोंचा दौऱ्यावर जात होते, घटनास्थळी पाहता मौक्यावर कोणीच नव्हते, तेव्हा त्यांनी क्षणाचा विलंब न करता रुग्णवाहिका बोलावून स्वतः लहान मुलाला रुग्णवाहिकेत टाकुन सर्वांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी जुलेख शेख, राकेश सडमेक आदिंनी सहकार्य केले.

गडचिरोली जिल्हयात 603 कोरोना तपासण्यांपैकी कोरोनाबाधित व कोरोनामुक्ताची संख्या निरंक.

इमेज
गडचिरोली, दि.25: आज गडचिरोली जिल्हयात 603 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधित व कोरोना मुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30841 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30087 आहे.  तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 7 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे.

इमेज
गडचिरोली, दि.25: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, इतर आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी दि.13 जून 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.  या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी/12 वी/पदवी/पदवीका परिक्षेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2020-21 व सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांनी दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे. निकष, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

गडचिरोली जिल्हयातील अवसायनातील सहकारी संस्था नोंदणी रद्द बाबत सुचना.

गडचिरोली ,  दि. 24 :  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली या कार्यालयाचे अधिनस्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज (वडसा), कोरची, चामोर्शी, अहेरी, भामरागड,मुलेचरा व सहकार अधिकारी श्रेणी-1, धानोरा, कुरखेडा,एटापल् ली, सिरोंचा सहकारी संस्था या कार्यालयाचे कार्यक्षेत्रात असणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये पुढील संस्थाचा व्यवहार गुंडाळण्यासाठी अवसायनाचे अंतिम आदेश काढून या संस्थांवर कलम 103 अन्वये अवसायकाची नेमणुक केलेली आहे. या संस्थांचे काहीही व्यवहार नसल्यामुळे कलम 109(3) च्या तरतुदींना अनुसरुन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 81(16) अन्वये संबंधीत अवसायकांनी या संस्थाच्या अंतिम सर्वसाधारण सभेचे दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संबंधीत कार्यालयात आयोजन केलेले आहे. गणपुर्ती अभावी सभा स्थगित झाल्यास अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येईल. या सभेस गणपुर्तीची आवश्यकता राहणार नाही. अवसायनातील संस्थांची नांवे नोंदणी क्रमांक व अवसायकांची नांवे इत्यादी सोबत देण्यात आलेली आहे.   अ . क्र . संस्...