अहेरी तालुका, दिनांक-31/10/25 - मौजा छल्लेवाडा येथे आज मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. छल्लेवाडा गावातील प्रमुख नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून अजय कंकडालवार यांच्या गडात भगदाड पाडले आहे. या प्रवेश सोहळ्यात किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, तुकाराम बोरकर, तुकाराम जुमडे, देवाजी जुमडे, दिवाकर जुमडे, कमलाकर जगजंपुला, दिवाकर वनकर, प्रभाकर वनकर, जिवन भसारकर, व्येंकटी बोरकर, आनंदराव दुर्गे आणि गणपती डोंगरे या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीत सर्वांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला. या वेळी कार्यकर्त्यांनी भाग्यश्रीताई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षबांधणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना, छल्लेवाडा गावातील हा प्रवेश अजय कंकडालवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून छल्लेवाडा हा कंकड...
GPS फोटो-व्हिडिओंसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; वनजमीन, सरकार कुरण व खाजगी जमिनींमधील उत्खननाची चौकशी करण्याची मागणी. अहेरी, दि. 19 जून 2026 : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील वनजमीन, सरकार कुरण आणि खाजगी जमिनींमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून त्याचा विविध रस्ते, खाण प्रकल्प, स्टॉकयार्ड, पार्किंग, औद्योगिक प्रकल्प व इतर विकासकामांमध्ये वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,एटापल्ली, वन विभाग, महसूल विभाग व इतर संबंधित यंत्रणांकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, परसलगोंदी येथील खाजगी जमीन सर्वे क्र. 178, रेकणार (स.) येथील वन विभागाचे सर्वे क्र. 42, तसेच महसूल विभागाचे सरकार कुरण सर्वे क्र. 159 येथून हजारो ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय विसामुंडी-गुंडापुरी आणि रेकणार-मंगेर मार्गावरील रस्त्यालगत अनेक ठिकाणी मोठमोठे उत्खनन खड्डे अद्यापही अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांनी सादर केलेल्या GPS छायाचित्रांमध्ये रेकणार (स.), मंगेर (स.) व परसलगोंदी परिसरात मोठ्या प...
गडचिरोली, (ता. अहेरी) – नागेपल्ली गावातील सार्वजनिक श्मशानभूमीवर अंतिम संस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास झालेल्या मोठ्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, १५-२० वराह (डुक्कर) पालन करणारे अतिक्रमणकार यांनी श्मशानभूमीवर बेकायदेशीर कब्जा करून ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करू न देण्याचा प्रयत्न केला. अडवणुकीदरम्यान त्यांनी धमक्या देत शिवीगाळ केली आणि हातोडी, काठ्या तसेच तलवारीसारख्या घातक शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात भीमराव विठ्ठल गुरनुले आणि आकाश गुरनुले गंभीर जखमी झाले आहे. तसेच प्रदीप ठाकरे, रोहित गुरनुले, श्रीहरि व दशरथ निकोडे यांना देखील मारहाण करण्यात आली. सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे हलविण्यात आले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, या श्मशानभूमीवरील अतिक्रमणाबाबत पूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र, अतिक्रमणकारांना पोलिस प्रशासनाची भीती नसल्याने त्यांनी पुन्हा कब्जा करून कायद्याचा सरळसरळ अनादर केला आहे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा