वेलगुर (ता. अहेरी, जि. गडचिरोली), दि. ०४ जुलै २०२५ रोजी दुपारी-१२.३० वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील वेलगुर टोला वळणाजवळ एक भीषण अपघात घडला. सुरजागड खाणीतून लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक (MH-३४ BZ-६८०२) आणि स्कॉर्पिओ (MH-३३ Y-९९९१) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः समोरील उजव्या बाजूचा चक्काचूर झाला. सदर स्कॉर्पिओ गाडी अमीत येनपेरेड्डीवार यांची असून, ते स्वतः चालक होते. त्यांच्या सोबत विशेष भटपलीवार हे देखील गाडीत होते. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची वेगमर्यादा, ओव्हरलोडिंग व रस्त्याची धोकादायक स्थिती हे संभाव्य कारण म्हणून स्थानिकांकडून चर्चिले जात आहे.
छल्लेवाडा (ता. अहेरी, जि. गडचिरोली) दि-19/07/2025 – महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करून तब्बल ३० वर्षे उलटली असताना, अजूनही अनेक गावांमध्ये अवैधरित्या दारू तयार करून खुलेआम विक्री केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर छल्लेवाडा येथील महिला प्रतिनिधींनी गावातील वाढत्या अवैध दारू विक्रीविरोधात उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, काही व्यक्ती गावातच साखर व गुळाचा वापर करून घरगुती पद्धतीने दारू बनवत असून, याशिवाय बाहेरगावाहूनही कंपनीत तयार होणारी दारू बेकायदेशीररीत्या आणून विक्री केली जात आहे. यामुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, कौटुंबिक कलह, महिलांवर अत्याचार, शिवीगाळ आणि वृद्ध नागरिकांवर मारहाणीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. महिलांनी आपल्या निवेदनात मागणी केली आहे की, गावामध्ये अवैधरीत्या तयार आणि बाहेरून आणली जाणारी दारू तात्काळ बंद करण्यात यावी. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. तसेच गावात पोलीस ग...
एटापल्ली (प्रतिनिधी): एटापल्ली नगरपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेले भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यावरील बॅनर चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. सामान्य जनतेमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या बॅनरविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) व ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF)ने तीव्र निषेध व्यक्त केला असून,नगराध्यक्ष व नगरपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर बॅनरमध्ये BNS अंतर्गत काही निवडक कलमे जसे की – कलम 69 (सरकारी कामात अडथळा), कलम 356 (वाद घालणे), कलम 117 व 120 (मारहाण), कलम 324 (गर्दी करणे) आदींचा उल्लेख करत, सरकारी कर्मचाऱ्यांना अडथळा आणल्यास शिक्षेची भीती दाखवण्यात आली आहे. भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी म्हटले. सदर बॅनर शासन निर्णयाशिवाय लावण्यात आला असून, तो बेकायदेशीर आहे. नगरपंचायत सारख्या शासकीय व सार्वजनिक कार्यालयात असा बॅनर लावणे म्हणजेच जनतेला दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हा बॅनर लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून, जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात आहे. नागरिक जर कार्यालयात येऊ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा