डिजिटल शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोलीत ४५३ गावांमध्ये उपक्रम यशस्वी गडचिरोली, (जिमाका) दि.०२: बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी तसेच भूमिहीन कुटुंबांना कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे शेती अधिक किफायतशीर करण्यास मदत होत आहे. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत ‘डिजिटल शेतीशाळा’ हा उपक्रम अभियान स्वरूपात राबविण्यात येत आहे. हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक मार्गदर्शनासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना शास्त्रोक्त व पीकनिहाय मार्गदर्शन करण्यात आले. झूम आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर विशेष...