पोस्ट्स

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

इमेज
• उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती गडचिरोली, (जिमाका)/ मुंबई, दि. ७ : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून ही मोहीम व्य...

डिजिटल शेतीशाळेतून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार; शेतकऱ्यांना आधुनिक मार्गदर्शन८ एप्रिल रोजी ‘जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ विषयावर विशेष सत्र.

गडचिरोली, (जिमाका) दि. 07 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली असून बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकरी व भूमिहीन कुटुंबांना सक्षम करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देत शेती किफायतशीर करण्यावर भर दिला जात आहे. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने प्रकल्पांतर्गत “डिजिटल शेतीशाळा” हे अभियान स्वरूपात राबविण्यात येत असून हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. “डिजिटल शेतीशाळा” हे एक ऑनलाईन व्यासपीठ असून, यामध्ये तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त तसेच पीकनिहाय उत्तम शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात येते. झूम आणि यूट्यूब या माध्यमांद्वारे हे सत्र प्रसारित केले जाणार आहे, ज्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही सहज सहभाग घेता येणार आहे. दि. ८ एप्रिल २०२६ रो...

जागतिक मौखिक आरोग्य महिन्यानिमित्त गडचिरोली येथे प्रभात फेरीद्वारे जनजागृती

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. ०७ : राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने दि. २० मार्च २०२६ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत “जागतिक मौखिक आरोग्य महिना” साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दि. १ एप्रिल २०२६ रोजी मौखिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रभात फेरी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथून सुरू होऊन फुले वॉर्ड, सर्वोदय वॉर्ड, आरमोरी रोड, गांधी चौक मार्गे पुन्हा जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे संपन्न झाली. या फेरीदरम्यान मौखिक आरोग्य व तोंडाचा कर्करोग याबाबत घोषवाक्ये देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली उपस्थित होते. तसेच डॉ. छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. माधुरी कीलनाके (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. बागराज धूर्वे (बाह्य संपर्क निवासी वैद्यकी...

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !

इमेज
आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा सकारात्मक निर्णय; ६ एप्रिल रोजी पत्र जारी शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; नोंदणीसाठी मिळाला अतिरिक्त कालावधी चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती सातत्याने संवेदनशील भूमिका घेत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेले आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी पाठपुराव्याला पुन्हा एकदा यश मिळाले आहे. हरभरा (चना) पिकाच्या ऑनलाईन नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ठोस पाठपुरावा केला होता. त्यानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी पत्र जारी करत नोंदणीची मुदत ६ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. मात्र, तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव तसेच वेळेअभावी अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकले नव्हते. ही बाब लक्...

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

इमेज
• मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि   टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि.६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे तसेच, प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असून, अंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे. लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक या सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुलांचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य आहे....

मिशन लक्षवेध अंतर्गत बॉक्सिंगसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी १३ एप्रिलला क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी २० खेळाडूंची होणार निवड; पात्र खेळाडूंनी अर्ज करण्याचे आवाहन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. ०६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे ऑलिम्पिक स्तरावरील १२ क्रीडा प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करून राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था, स्पर्धा आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडू प्रोत्साहन व करिअर मार्गदर्शन यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा मानस आहे. मिशन लक्षवेध अंतर्गत राज्यस्तरावर उच्च कार्यक्षमता केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र तसेच जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत असून गडचिरोली जिल्ह्यात बॉक्सिंग या क्रीडा प्रकारासाठी २० गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंचे वय ३१ डिसेंबर २०२६ रोजी २१ वर्षांखालील असणे आवश्यक आहे. खेळाडू हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तसेच शालेय अथवा अधिकृत क्रीडा स्पर्धांमध्...

डिजिटल शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

इमेज
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोलीत ४५३ गावांमध्ये उपक्रम यशस्वी गडचिरोली, (जिमाका) दि.०२: बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी तसेच भूमिहीन कुटुंबांना कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे शेती अधिक किफायतशीर करण्यास मदत होत आहे. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत ‘डिजिटल शेतीशाळा’ हा उपक्रम अभियान स्वरूपात राबविण्यात येत आहे. हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक मार्गदर्शनासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना शास्त्रोक्त व पीकनिहाय मार्गदर्शन करण्यात आले. झूम आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर विशेष...