पोस्ट्स

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

इमेज
अहेरी तालुका, दिनांक-31/10/25 - मौजा छल्लेवाडा येथे आज मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. छल्लेवाडा गावातील प्रमुख नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून अजय कंकडालवार यांच्या गडात भगदाड पाडले आहे. या प्रवेश सोहळ्यात किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, तुकाराम बोरकर, तुकाराम जुमडे, देवाजी जुमडे, दिवाकर जुमडे, कमलाकर जगजंपुला, दिवाकर वनकर, प्रभाकर वनकर, जिवन भसारकर, व्येंकटी बोरकर, आनंदराव दुर्गे आणि गणपती डोंगरे या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीत सर्वांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला. या वेळी कार्यकर्त्यांनी भाग्यश्रीताई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षबांधणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना, छल्लेवाडा गावातील हा प्रवेश अजय कंकडालवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून छल्लेवाडा हा कंकड...

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी - भाग्यश्रीताई आत्राम यांची मागणी.

इमेज
अहेरी (प्रतिनिधी) :- गेल्या काही दिवसांपासून अहेरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कापणीस आलेले धान, कापूस तसेच इतर पिकांवर या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी अहेरी येथील तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना निवेदन देऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करून त्यांना योग्य नुकसानभरपाई व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच भाग्यश्रीताई आत्राम यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा. पंचनामे तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल याची काळजी प्रशासनाने घ्यावी.” या निवेदनावेळी श्रीनिवास वीरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, अब्दुल रहमान, सुमित मोतकुरवार, ॲड. प्रभाकर डोंगरे, सुनील रत्नम, अनिल रत्नम, किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, सुधाकर सुंदीला, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, ...

मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.

इमेज
सिरोंचा,   दिनांक 26/10/2025 :– सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातात पिंटीपाका येथील ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक किंवा सावधानता फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या निष्काळजीपणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांच्यावर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने चालकाचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी बामणी गावाजवळ ट्रॅक्टर चालवित असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. घटनास्थळीच चालकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सांगितले की, महामार्गावर धोक्याचे किंवा दिशा दर्शविणारे कोणतेही फलक नसल्याने चालकाला पुढील वळणाची कल्पना आली नाही, परिणामी अपघात झाला. २ कोटी रुपयांची...

अतिसंवेदनशिल पोलीस स्टेशन कवंडे येथे मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी जवानांशी साधला संवाद.

इमेज
गडचिरोली – उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र, श्रीमती रश्मि शुक्ला यांनी भेट देऊन जवानांच्या अभियान तयारीचे परीक्षण केले आणि प्रत्यक्ष संवाद साधला. पोलीस महासंचालकांच्या भेटीदरम्यान पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-60 च्या जवानांसोबत चर्चा केली गेली. या संवादामध्ये प्रतिकूल आणि अतिसंवेदनशिल भागात पोलीस स्टेशनच्या स्थापनेसह त्याच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्यात आली आणि जवानांची कर्तृत्वाबद्दल विशेष प्रशंसा केली गेली. या कार्यक्रमास मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये मा. डॉ. श्री. छेरिंग दोरजे, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ), नागपूर, श्री. अजय कुमार शर्मा, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (...

एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गटात शेकडो युवक- महिलांचा पक्ष प्रवेश.

इमेज
एटापल्ली (प्रतिनिधी) – “गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट हेच खरे पर्याय” असा विश्वास दाखवत एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी ग्रामपंचायत क्षेत्रातील शेकडो युवक व महिलांनी मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादीची ताकद अधिक भक्कम केली. आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या उपक्रमासाठी श्री. उमेशजी दासरवार, मनीषजी दुर्गे व संजयजी चरडुके यांनी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने संघटनात्मक पातळीवर जोरदार पायाभरणी केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कार्यक्रमाला सिनेट सदस्य आदरणीय तनुश्री ताई आत्राम, तालुकाध्यक्ष सांभा हिचामी, ज्येष्ठ नेते नसरू भाई शेख, दामा नरोटेजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रवेश केलेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे आहे गाव – वाघेझरी प्रवीण शेंडे, मनोज कोवासे, अंबादास कावळे, प्रकाश म...

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.

इमेज
गडचिरोली, (ता. अहेरी) – नागेपल्ली गावातील सार्वजनिक श्मशानभूमीवर अंतिम संस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास झालेल्या मोठ्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, १५-२० वराह (डुक्कर) पालन करणारे अतिक्रमणकार यांनी श्मशानभूमीवर बेकायदेशीर कब्जा करून ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करू न देण्याचा प्रयत्न केला. अडवणुकीदरम्यान त्यांनी धमक्या देत शिवीगाळ केली आणि हातोडी, काठ्या तसेच तलवारीसारख्या घातक शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात भीमराव विठ्ठल गुरनुले आणि आकाश गुरनुले गंभीर जखमी झाले आहे. तसेच प्रदीप ठाकरे, रोहित गुरनुले, श्रीहरि व दशरथ निकोडे यांना देखील मारहाण करण्यात आली. सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे हलविण्यात आले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, या श्मशानभूमीवरील अतिक्रमणाबाबत पूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र, अतिक्रमणकारांना पोलिस प्रशासनाची भीती नसल्याने त्यांनी पुन्हा कब्जा करून कायद्याचा सरळसरळ अनादर केला आहे...

अखेर मागणीला यश : चंद्रपूर बस डेपोतुन सुटणार चंद्रपूर - एटापली बस, भाकपा.

इमेज
एटापली तालुक्यातील नागरिकांना दिलासा. अखेर मागणीला यश. एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून मांडलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सायंकाळी ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीकडे बस सुटावी  ही मागणी फक्त वाहतुकीपुरती नव्हती, तर ती हजारो लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित होती. आरोग्य उपचारासाठी चंद्रपूरला जाणाऱ्या शेकडो नागरिकांना दिवसभर तपासण्या, औषधोपचार आणि औपचारिकता पार पाडल्यानंतर परतण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसायचा. त्यामुळे वृद्धांना शहरात मुक्काम करावा लागे, महिलांना आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागे, तर आजारी रुग्णांना परक्या शहरात रात्री घालवावी लागे. ही अडचण केवळ खर्चिकच नव्हती, तर मानवी वेदनाही निर्माण करणारी होती. याच पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने ही मागणी ठामपणे मांडली. भाकपा जिल्हा सहसचिव व AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सातत्यपूर्ण निवेदनं, आंदोलने आणि पाठपुरावा करून हा मुद्दा शासनदरबारी नेला. अखेर विभाग नियंत्रक, राज्य परिवहन मंडळ गडचिरोली यांनी,लेखी पत्राद्वारे अधिकृत कळविले की ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीसाठी बससेव...