कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!
कोटगल (गडचिरोली): "दारूमुळे उध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावातील शांती टिकवण्यासाठी आता गप्प बसणार नाही," असा आक्रमक पवित्रा कोटगल येथील महिलांनी घेतला आहे. कोटगल ग्रामसभा, तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावात 'संपूर्ण दारूबंदी' चा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार आहेत. दारूमुळे कोलमडलेली कुटुंबव्यवस्था आणि महिलांचा आक्रोश गावसभेमध्ये महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक पुरुषांचे आपल्या संसाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दारू पिऊन घरी आल्यावर महिलांना अमानवीय वागणूक देणे, जेवताना विनाकारण मुलांवर आणि पत्नीवर शिवीगाळ करणे, आणि घरात सतत भांडण-तंटा करणे यामुळे मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम होत आहेत. दारूमुळे अनेक तरुण आणि मध्यमवयीन लोक गंभीर आजारांना बळी पडत असून, कुटुंबाचा आर्थिक कणा मोडला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून आता महिलाशक्ती एकवटली आहे. माहिती देणाऱ्याचे नाव राहणार 'पूर्णपणे गुपित' गावात लपून-छपून दारू व...