पोस्ट्स

येनापुर-जयरामपूर मार्गावरील वाहतुक प्रतिबंधित

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : पोलीस स्टेशन, आष्टी हद्दिअंतर्गत मेमर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमीटेड कंपनीचा लोह प्रकल्प मोजा कोनसरी येथे सुरु असून सदर प्रकल्पाकरीता मोजा मुधोली चक नं. २ पारडी देव (रिठ) व जयरामपूर येथील खाजगी शेतजमीन व शासकीय जमीनीचे मोजणी व भुसंपादन दिनांक ११ मार्च २०२६ रोजी पासुन होणे प्रस्तावित असून सदर गावामध्ये शेतजमीन भुसंपादनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने कारवाई करतांना शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे आंदोलने, निदर्शने अथवा विरोध प्रदर्शन होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होण्याची शक्यता असल्यामुळे येनापुर ते जयरामपूर कडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुक प्रभावीत होऊन जमावाकडून अनुचित प्रकार घडुन त्या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना व लोकांना त्रास होऊ नये याकरीता येनापुर ते जयरामपूर कडे जाणारा मार्ग दिनांक १० मार्च २०२६ ते १४ मार्च २०२६ रोजीपर्यंत वाहतुक रहदारीकरीता सदर मार्ग बंद करण्यास या कार्यालयास विनंती केलेली आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन याव्दारे आदेशित करीत आहे की, येनापुर ते जयरामपूर दोन्ही...

जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे पत्रान्वये जिल्ह्यात दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा तसेच दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) सुरु झालेली आहे. दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पासुन मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु असून दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रमजान ईद सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच सी.पी.आय. (माओवादी) या नक्षल संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा माओवाद्यांतर्फे माहे फेब्रुवारी ते जून २०२६ या कालावधी दरम्यान टि. सी. ओ. सी. राबविण्यात येणार आहे. या टि. सी. ओ. सी. दरम्यानच्या कालावधीत माओवाद्यांद्वारे हिंसक घटना, शासकिय कार्यालय, बांबु / बिट डेपो, दुरध्वनी टॉवर्स इत्यादीची जाळपोळ, आयईडी, क्लोमोर, माईन्स प्लँट करणे, भुसरुंग स्फोट घडवून आणने, सुरक्षा दले पोलीस पथक तसेच पोलीस स्टेशन वर हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, रसत्यांवर अडथळे निर्माण करुन रहदारी बंद करणे त्याचप्रमाणे अॅक्शन टिम द्वारे महत्वाचे राजकीय व्यक्ती, पोलीस अधिकारी / अमलदार व इतर शास...

14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिरुद्ध लिं. टिकले यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे तसेच दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.            राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, प...

मौजा फोदेवाडा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ :उपपोलीस स्टेशन, लाहेरी अंतर्गत मौजा- फोदेवाडा जंगल परिसरात, दि.५  फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकी दरम्यान ७ नक्षल मृतदेह( ४ पुरुष ३ महिला) शस्त्रासह आढळुन आल्याचे व एक पोलीस शिपाई शहिद झाल्याचे कळविण्यात आले आहे. सदर घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींचे/मृतदेहाचे कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी करावयाचे आहे. तरी जाहिररित्या सुचित करण्यात येते की, या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांचे न्यायालयात जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत. असे उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली, अमर राऊत यांनी कळविले आहे. चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन लेखी निवेदन द्यावे. आपण पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन, आपला या घटने विषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबं...

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

इमेज
कोटगल: येथील साथ फाउंडेशन कोटगल ता. जि.गडचिरोली आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सौ. ममताताई दुधबावरे सरपंच ग्रा.प. कोटगल. मोहन ठाकरे अध्यक्ष तंटामुक्त समिती कोटगल, सुमित बुरांडे अभाविप गडचिरोली, जयेश ठाकरे, साथ फाउंडेशन संस्थेचे सचिव चेतन कोलते आणि वाचनालयाचे हरीश कोलते, प्रणय मेश्राम, साहिल मेश्राम सर्व सदस्य उपस्थित होते. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे," अत्यंत साध्या पण प्रेरणादायी वातावरणात हा उपक्रम पार पडला. यावेळी परिसरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहून महाराजांना मानवंदना दिली. व शिवगर्जना आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे अर्थ संकल्पात प्रतिबिंब

इमेज
राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे अर्थ संकल्पात प्रतिबिंब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा या सर्व क्षेत्रांचा समतोल विचार करून सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, राज्यातील शेत...

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक

इमेज
विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केलेल्या सन 2026-27 च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी शिक्षण क्षेत्राकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांचा विकास, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण प्रणालीशी सुसंगत सुविधा देण्याबाबत या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली दिसत नाही. राज्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत बाबींवर लक्ष न देता केवळ निवडणुका, राजकारण आणि मत मिळवण्याच्या दृष्टीने काही घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. ठेकेदारी पद्धतीला चालना देत कंत्राटदारांना फायदा होईल अशा योजनांना प्राधान्य देण्यात आले असून शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत सरकारची भूमिका निराशाजनक आहे. शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे बळकटीकरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण आणि विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुव...