पोस्ट्स

कलम ३६ अन्वये मनाई आदेश जाहिर

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : आगामी काळात गडचिरोली जिल्हयात दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्याअर्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पडावे याकरीता गडचिरोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.  प्र.पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम रमेश यांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढे नमुद केल्या प्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणूकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दरम्यान धार्मिक पुजा, स्थानाच्या जवळ लोकांचे वागणूकीबाबत निर्बंध घालण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या ठिकाणी बाधा होणार याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणूकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दरम्यान रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वा...

डिजिटल शेतीशाळेमधून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार; जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

इमेज
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ऑनलाइन मार्गदर्शन; २८७ सत्रांची यशस्वी नोंद पुढील सत्र १५ एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली, (जिमाका) दि. ०९ : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करून शेती अधिक किफायतशीर करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात “डिजिटल शेतीशाळा” हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक मार्गदर्शन तज्ज्ञांद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक व जैविक शेतीविषयक जागरूकता वाढत आहे. या डिजिटल शेतीशाळेमध्ये झूम (Zoom) व यूट्यूब (YouTube) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त पद्धती, हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान आणि जैविक शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित सत्रामध्ये “जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क व दशपर्णी अर्क यांसारख्या नैसर्गिक घटकांच्या निर्मितीबाबत माहिती देण्...

राष्ट्रीय लोकअदालतीतून त्वरित न्यायनिवाडा; ९ मे रोजी जिल्हाभर आयोजन

इमेज
नागरिक, पक्षकार व वकील बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि. ०९ : प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने शनिवार, दिनांक 09 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असून नागरिकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. या लोकअदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई दावे, कौटुंबिक वाद (घटस्फोट वगळून), भूसंपादन प्रकरणे, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे तसेच वीज देयके व पाणीपट्टी वाद आणि धनादेश अनादर (कलम 138) यांसारखी विविध प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली जाणार आहेत. याशिवाय न्यायालयात अद्याप दाखल न झालेली परंतु वादग्रस्त असलेली प्रकरणेही लोकअदालतीच्या माध्यमातून सोडविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकअदालतीत दिलेला निकाल अंतिम स्वरूपाचा असून त्याविरु...

उन्हाळयात उष्माघाताने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी कामगार अधिकारी यांचे सूचना

गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : गडचिरोली जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढत असून, उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. येत्या उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि उष्मघातामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाळी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना उष्माघाताचा (Heat Wave) धोका निर्माण होऊ नये, यासाठी सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली तर्फे सर्व मालक, कंत्राटदार आणि कामगारांना खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बांधकाम कामगार, विटभट्टी कामगार, रोजंदारी कामगार मजूर व सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी महत्त्वाच्या  सूचना :-  १. कामाच्या वेळेत बदल :  शक्य असल्यास कामाच्या वेळा अशा प्रकारे नियोजित कराव्यात की, दुपारी १२ ते ४ या सर्वाधिक उष्णतेच्या काळात उन्हात काम करणे टाळता येईल. २. पाण्याचे सेवन :  तहान लागलेली नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पुरेसे पाणी प्यावे. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय मालकांनी करणे बंधनकारक आहे. ३. पेहराव :  बा...

पुस्तोला क्लस्टरमध्ये एकात्मिक शेती पद्धतीसाठी नाबार्डकडून ४.४७ कोटींचा प्रकल्प मंजूर

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आदिवासी भागात शाश्वत उपजीविकेला चालना गडचिरोली, (जिमाका) दि.९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आदिवासी भागातील शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुस्तोला क्लस्टरमध्ये एकात्मिक बोडी आधारित शेती पद्धती प्रकल्पास नाबार्डकडून मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेला बळकटी मिळणार असून शेती अधिक किफायतशीर आणि टिकाऊ करण्यास मदत होणार आहे. नाबार्डच्या ट्रायबल डेव्हलपमेंट फंड अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून ‘वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट’ (WOTR) या संस्थेमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत धानोरा तालुक्यातील पुस्तोला क्लस्टरमधील एकूण १५ गावांतील ४९१ कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी एकूण ४४७.८६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी ३३७.६० लाख रुपये नाबार्डकडून अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच इतर समन्वयातून ३५.२८ लाख रुपये आणि लाभार्थ्यांचा ७४.९८ लाख रुपयांचा सहभाग राहणार आ...

वडसा तालुक्यातील विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनफिल्ड आढावा; पाणीपुरवठा योजनेच्या संथगतीवर नाराजी

इमेज
६० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला गती देण्याचे निर्देश; कृषी, सूक्ष्म अन्नप्रक्रिया व पर्यटन प्रकल्पांची पाहणी गडचिरोली, (जिमाका) दि. ८ : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज वडसा (देसाईगंज) तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामे, सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक उपजीविका उपक्रमांचा सखोल ऑनफिल्ड आढावा घेतला. या दौऱ्यात पाणीपुरवठा, कृषी, सूक्ष्म अन्नप्रक्रिया तसेच पायाभूत सुविधा यासंबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्यासोबतच अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे यांनीही आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित ठिकाणी भेटी देऊन विविध बाबींची पाहणी करत सर्वंकष आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेवर नाराजी देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे ६० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करताना कामाच्या संथ गतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना निर्धारित वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद ...

८ ते १४ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह; विविध प्रबोधनात्मक उपक्रमांनी जनजागृतीला चालना

गडचिरोली, (जिमाका) दि. ८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह विविध प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीचा संदर्भ, महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य, तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक समता सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती करण्यासाठी जिल्हाभर विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सामाजिक समता सप्ताहाचा प्रारंभ ८ एप्रिल रोजी संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रती प्रत्येक कुटुंबापर्यंत वितरित करून करण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, महाड चवदार तळे सत्याग्रह आणि मानव...