पोस्ट्स

देशातील पहिली डिजिटल जनगणना-२०२७; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : भारतातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून ओळखली जाणारी जनगणना-२०२७ ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून, यात स्वगनेच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, टप्पा १ – घरयादी व घरगणना दि. १६ मे २०१६ ते १४ जून ३०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर टप्पा २ – लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अचूक व विश्वसनीय माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-गणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. ही सुविधा दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारी Self Enumeration ID (SE ID) जतन करून ठेवणे आवश्यक असून, प्रगणक घरी आल्यावर ही ID त्यांना देणे बंधनकारक राहणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागाती...

उद्योगात प्रत्यक्ष कामाची तरुणांना संधी, पंतप्रधान इंटर्नशीन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात.

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : भारताच्या माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेंतर्गत “ पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची “ घोषणा केलेली आहे.सन २०२६ -२७ मध्ये या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून, देशभरात ३१ हजार ४८० तरुणांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, वाहननिर्मिती, औषधनिर्माण, उत्पादन, माध्यम, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यप्रशिक्षण उपलब्ध आहे.या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून, प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांची शैक्षणिक पात्रता दहावीपासून बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशी असावी.  पू...

गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची ‘खरीप हंगामपूर्व कार्यशाळा २०२६’ उत्साहात संपन्न

इमेज
रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : कृषी विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPC) एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आगामी खरीप हंगामाचे नियोजन, हवामान बदल आणि शाश्वत शेती पद्धतींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शन आणि आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती प्रिती हिरळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ उभी करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, युरीया आणि डीएपी (DAP) सारख्या रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी सेंद्रिय स्व निर्मित खतांवर भर द्यावा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा. जैविक निवीष्ठा संसाधन केंद्र (BIRC) मार्फत निर्मित निविष्ठांचा वापर करण्यावर भर देत, 'एल निनो' (Al Nino) सारख्या हवामान बदल...

आश्रमशाळा विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढविण्यासाठी कार्यशाळा

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके राहणार उपस्थित गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने शासकीय आश्रम शाळांतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनेबाबत नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्थानिक धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॉलमध्ये शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता केलेले आहे. या कार्यशाळेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यशाळेत राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड ,सह सचिव म.रं. शेळके ,उप सचिव र.तु.जाधव, कक्ष अधिकारी स.वि.कोवे ,नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह ,नाशिक विभागाचे उप आयुक्त संतोष ठुबे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम.आदींसह नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागपूर विभागातील गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा, वर्धा व नागपूर या नऊ प्रकल्पातील एकूण ७६ शा...

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा २५ एप्रिल रोजी गडचिरोली दौऱ्यावर

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दिनांक २५ एप्रिल रोजी गडचिरोली येथे दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान ते शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासंदर्भातील उपाययोजनांवरील कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.  दौरा कार्यक्रमानुसार, शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. त्यानंतर सकाळी ९ वाजता शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित कार्यशाळेत महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड, गडचिरोली येथे उपस्थित. दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकीस उपस्थित. सायंकाळी सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली येथे मतदान केंद्र क्रमांक १/१ निश्चित करण्यात आले असून, ते जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला, कॉम्पलेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे असणार आहे. या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या पात्र मतदारांनी मतदानासाठी येताना ओळख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व पात्र मतदारांना आवाहन केले आहे की, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.

आता मत्स्यव्यवसायाला कृषीचे बळ, वीजदर, वीमा योजनेचाही लाभ.

इमेज
किसान क्रेडिट कार्ड कर्जावर मिळणार व्याज सवलत गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : राज्य शासनाने मत्स्यव्यवसाय क्षेत्राला (प्रक्रिया उद्योग वगळता) अधिकृतपणे कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य कास्तकारांना किसान क्रेडिट कार्डवर २ लाखांपर्यंत कर्जावर ४ टक्यांपर्यंत व्याज सवलत मिळणार आहे. शासन निर्णयानुसार, मत्स्य शेतकऱ्यांना कृषी दराने वीजपुरवठा, किसान क्रेडिट कार्डची सुविधा, कृषी दराने बँकांकडून कर्ज, तसेच कृषी विम्याप्रमाणे कमी हप्त्यांतील विमा संरक्षण यांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना जसे सौरऊर्जा अनुदानाचे लाभ मिळतात, तसेच लाभ मत्स्यव्यवसायिकांसाठीही लागू करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार मच्छिमार व मत्स्यसंवर्धकांना व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी राष्ट्रीयकृत व इतर बँकांकडून अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज ७ टक्के व्याजदराने उपलब्ध होते. मात्र कर्जाची परतफेड एका वर्षात पूर्ण केल्यास केंद्राकडून ३ टक्के व्याजदर परतावा मिळत असल्याने मच्छिमारांना प्रत्यक्षात ४ टक्के व्याज भरावा लागत होता. याच धर्तीवर राज्य सरक...