पोस्ट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे अर्थ संकल्पात प्रतिबिंब

इमेज
राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे अर्थ संकल्पात प्रतिबिंब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा या सर्व क्षेत्रांचा समतोल विचार करून सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, राज्यातील शेत...

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक

इमेज
विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केलेल्या सन 2026-27 च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी शिक्षण क्षेत्राकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांचा विकास, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण प्रणालीशी सुसंगत सुविधा देण्याबाबत या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली दिसत नाही. राज्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत बाबींवर लक्ष न देता केवळ निवडणुका, राजकारण आणि मत मिळवण्याच्या दृष्टीने काही घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. ठेकेदारी पद्धतीला चालना देत कंत्राटदारांना फायदा होईल अशा योजनांना प्राधान्य देण्यात आले असून शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत सरकारची भूमिका निराशाजनक आहे. शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे बळकटीकरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण आणि विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुव...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत

इमेज
वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळाली आहे. गोपाल गणेश साखरे (बुलढाणा) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आमदार मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. १० मे २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला होता आणि संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.या घटनेनंतर आमदार सुधीर मुन...

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

इमेज
गडचिरोली : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार श्री. सुधाकर अडबाले व माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत विदर्भातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे आंदोलन होणार असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. राज्यातील खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी अनुदानित शाळा, विजाभज तसेच आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु नंतर १०० टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत अशासकीय ठराव शासकीय ठराव पारित करून केंद्राकडे पाठवणार : राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे आश्वासन

इमेज
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, दूरदृष्टीचे विचारवंत आणि प्रभावी साहित्यिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ या उपाधीने मरणोत्तर गौरविण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे अधिकृत ठराव पाठवावा, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत अशासकीय ठरावाद्वारे केली.   विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याबाबतचा शासकीय ठराव राज्य शासनाच्या वतीने मांडण्यात येईल आणि तो केंद्र शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल.   आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृहात ठराव मांडताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सावरकरांचे संपूर्ण आयुष्य हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रभक्तीच्या जागृतीसाठी आणि राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी समर्पित होते. इंग्रजांच्या विरोध...

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहीम; गडचिरोली जिल्ह्यातील १४ वर्षांच्या मुलींना मिळणार मोफत सुरक्षा कवच

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०५ : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही आता गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध (Cervical Cancer) लढा देण्यासाठी 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत, मात्र १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व मुलींना ही लस शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. *महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) वाढते प्रमाण लक्षात घेता, गडचिरोली जिल्हा प्रशासनाने या गंभीर आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १४ वर्षे पूर्ण असलेल्या मुलींसाठी 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.  या मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, "हा आजार टाळता येण्यासारखा आहे आणि वेळेवर दिलेली लस मुलींच्या भविष्यातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. हे लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून सर्...

चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; आरोग्य प्रशासनाचा खुलासा

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०५: चामोर्शी तालुक्यातील मौजा मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना 'आयडीए' (IDA) मोहिमेअंतर्गत गोळ्या दिल्यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्यात आली असून, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तपासणीतील मुख्य निष्कर्ष:  मोहिमेची व्याप्ती: मुरखळा माल येथील जिल्हा परिषद शाळेतील १८० पैकी १७८ विद्यार्थी आणि ७ शिक्षकांना, तर लोकमान्य टिळक शाळेतील ३७ विद्यार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत गोळ्या देण्यात आल्या होत्या.   तपासणी अहवाल:  गोळ्या खाऊ घातल्यानंतर २४ तासांच्या आत कोणत्याही प्रकारची गुंतागुंत आढळून आली नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम दुमपट्टीवर यांनी सांगितले आहे. आजारपणाचे कारण: चौकशीअंती असे दिसून आले की, काही विद्यार्थ्यांमध्ये आढळलेली ताप, सर्दी आणि उलट्यांची लक्षणे ही गोळ्यांच्या सेवनामुळे नसून, सध्याच्या बदलत्या ...