पोस्ट्स

जिल्ह्यात कलम ३७ (१)(३) अन्वये मनाई आदेश जारी

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: जिल्ह्यात दिनांक ०१ मे २०२६ रोजी सर्वत्र बौध्द पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. तसेच सी.पी.आर. (माओवादी) या नक्षल संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माओवाद्यांतर्फे माहे फेब्रुवारी ते जुन, २०२६ या कालावधी दरम्यान टि.सी.ओ.सी. राबविण्यात येणार आहे. या टि.सी.ओ.सी. दरम्यानच्या कालावधीत माओवाद्यांव्दारे हिंसक घटना शासकीय कार्यालय बांबू/बिट डेपो, दुरध्वनी टॉवर्स इत्यादीची जाळपोळ, आयइडी- क्लेमोर माईन्स प्लँट करणे, भूसुरंग स्फोट घडवून आणने, सुरक्षा दले, पोलीस पथक तसेच पोलीस स्टेशनवर हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, रसत्यांवर अडथळे निर्माण करुन रहदारी बंद करणे त्याचप्रमाणे ॲक्शन टिम व्दारे महत्वाचे राजकिय व्यक्ती, पोलीस अधिकारी/अंमलदार व इतर शासकिय अधिकारी तसेच पोलीसांना मदत देणारे बातमीदार यांना लक्ष करणे इत्यादी हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्न करु शकतात. त्याचप्रमाणे रेल्वे संपतीस सुद्धा धोका पोहोचविण्याची तसेच विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयो...

अक्षयतृतीयाला बालविवाह केल्यास कठोर कार्यवाही

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर दरवर्षी बालविवाह पार पडतात हे बालविवाह लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महीला व बालविकास विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. या दिवशी बालविवाह झाल्यास थेट कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीडीपीओवर जवाबदारी- बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अँक्शन प्लॅन तयार केला आहे यात ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. तर शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंडित, छायाचित्रकारावर होणार कार्यवाही- बालविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणारे व्यक्ती, धार्मिक गुरु, पंडित सेवा देणारे व्यवसायिक मंडप, मालक, फोटोग्राफर केटरिंग व्यवसायिक, लॉन्स मालक अणि वाजंत्री यांच्यावरही करयदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहेत. शुभ मुहुर्ताचा गैर फायदा- अक्षयतृतीया हा सण साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक मानला जातो यामुळे हा शुभ मुहुर्त लक्षात घेता या शुभ मुहुर्तावर विवाह विधी केल्या जात...

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे जागतिक हिमोफेलिया डे उत्साहात साजरा

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे वार्ड क्रमांक १० मध्ये जागतिक हिमोफेलिया डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश हिमोफेलिया या रक्तस्रावाशी संबंधित दुर्मिळ आजाराबाबत जनजागृती करणे व रुग्णांना योग्य उपचार व काळजीबाबत मार्गदर्शन करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात रुग्ण व उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिमोफेलिया या आजाराचे स्वरूप, त्याची कारणे, लक्षणे, निदान व उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रुग्णांना नियमित तपासणीचे महत्त्व, आवश्यक औषधोपचार, तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.  सदर कार्यक्रमास एकूण ४ हिमोफेलिया रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, डॉ. इंद्रजीत नागदेवते (भिषक वर्ग १), डॉ. मनीष मेश्राम (भिषक तज्ञ), डॉ. बागराज धुर्वे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. राकेश चहांदे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. अंजली साखरे (BTO), डॉ. आशिष खुणे (वैद्यकीय ...

डिजिटल शेतीशाळा :हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT)

गडचिरोली, (जिमाका) दि. १६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० प्रकल्प अंतर्गत गडचिरोली जिल्हाची निवड झाली असून या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश बदलत्या हवामानाशी जूळउन घेण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन कुटुंबाना सक्षम करणे व कृषी आधारित उपजीविकेचे साधने उपलब्ध करून शेती किफायतशीर करणे हा आहे.बदलत्या हवमानाचा शेतीला कमीत कमी फटका बसेल यासाठी डिजिटल शेतीशाळेचे गावनिहाय नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रकल्पा अंतर्गत डिजिटल शेतीशाळा अभियान स्वरूपात राबविण्यात आले त्यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशनद्वारे संचलित “डिजिटल शेतीशाळा” हे एक ऑनलाईन व्यासपीठा द्वारे तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम (Zoom) आणि यूट्यूब (YouTube) च्या माध्यमातून दिले गेले.   सदर शेती शाळा मध्ये पुढील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. • भाग -३ एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर. उपरोक्त शेतीशाळा नियोजित ...

खत साठ्याची माहिती आता २४ तास आधी; वितरणावर प्रशासनाचा देखरेख

इमेज
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पारदर्शकता वाढविण्यासाठी नवे नियम लागू  गडचिरोली, (जिमाका) दि. १६ : खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद गडचिरोली व कृषी विभागामार्फत आता जिल्ह्यातील खत वितरण व्यवस्थेवर विशेष ‘देखरेख’ ठेवण्यात येणार असून, खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या २४ तास आधीच त्याची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी सचिवांच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर खतांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येऊन शेतकऱ्यांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. नव्या नियमावलीनुसार, खतांच्या रॅक किंवा वाहने जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी किमान एक दिवस आधी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठ...

२६ एप्रिल रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक आयोजित

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१६ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२६ करीता मतदान दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यत, मतदान केंद्र क्रमांक १/१- गडचिरोली, जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला, कॉम्पलेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे होणार आहे. याकरिता पात्र मतदारांनी त्यांचेकडे असलेले महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदानाकरीता येतांना ओळख पटविण्याकरीता सोबत आणने अनिवार्य आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाकरीता उपरोक्त मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१६ : कौशल्य, रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धा निबंध लेखन स्वरूपात असून निबंधाचा विषय 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य' असा आहे. निबंध स्पर्धा ही मराठी भाषेत असून स्पर्धचे दोन गट ठेवण्यात आले आहेत. गट १ मध्ये आय.टी.आय. / डिप्लोमा प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी / बायफोकल व एमसीव्हिसी ( mcvc) विद्यार्थ्यांसाठी ५०० ते ८०० शब्द मर्यादा असेल व गट २ मध्ये पुरुष/महिला खुला गटासाठी ८०० ते १२०० शब्द मर्यादा असेल. निबंध मूळ ( सत्यप्रत ) असावा.. कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर सुस्पष्ट आणि सुसंस्कृत असावा. निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल. मात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध https://forms...