देशातील पहिली डिजिटल जनगणना-२०२७; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : भारतातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून ओळखली जाणारी जनगणना-२०२७ ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून, यात स्वगनेच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, टप्पा १ – घरयादी व घरगणना दि. १६ मे २०१६ ते १४ जून ३०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर टप्पा २ – लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अचूक व विश्वसनीय माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-गणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. ही सुविधा दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारी Self Enumeration ID (SE ID) जतन करून ठेवणे आवश्यक असून, प्रगणक घरी आल्यावर ही ID त्यांना देणे बंधनकारक राहणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागाती...