पोस्ट्स

७७ वर्षांत प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांचा बीनागुंडा-लाहेरी या दुर्गम भागातील नागरिकांशी मुक्त संवाद

इमेज
नक्षलमुक्तीच्या दिशेने विश्वासाचा पूल; फार्मर आयडी, पायाभूत सुविधा व आरोग्य सेवांवर भर गडचिरोली, (जिमाका) दि.२९: गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षांत प्रथमच जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी खुलेपणाने संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या अडचणींची थेट पाहणी केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना वैयक्तिक व सामूहिक वनपट्ट्यांबाबत माहिती घेतली. “वनपट्टेधारकांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून घ्यावा, कारण याच ओळखपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाईल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे अशा मूलभूत मागण्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे...

गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना सुमारे ३१.३५ लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती गडचिरोली, (जिमाका) दि.२९: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३१ रुग्णांना सुमारे ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य मिळत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यार...

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तीन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२९: राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दिनांक २९ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात विविध विकासकामांचा आढावा तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. २९ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजता देसाईगंज (वडसा) येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पदस्पर्शभूमी (दीक्षाभूमी) येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. रात्री ९.३० वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहात मुक्काम. गुरुवार (दि. ३० एप्रिल) रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे विविध विषयांवरील आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. सायं. ६.३० वाजता विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार (दि. १ मे) रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पोलीस क्रीडांगण, गडचिरोली येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्...

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या - जिल्हाधिकारीसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २८ : सेवा हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक, वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थितांना शपथ देत सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी यावेळी सांगितले की, शासनाच्या विविध सेवा निर्धारित कालमर्यादेत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. सेवांमध्ये कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे. प्रामाणिकपणा, निःस्वार्थी वृत्ती आणि संवेदनशीलता या मूल्यांच्या आधारे काम केल्यास नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवांमध्ये पारदर्शकता राखणे, वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे तसेच लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला...

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

गडचिरोली, (जिमाका) दि.२८: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) नवी दिल्ली यांच्यामार्फत NEET (UG) -२०२६ ही परिक्षा दिनांक ०३ मे २०२६ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यत जिल्हा मुख्यालयातील विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षा केंद्रावरील परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या २०० मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे. निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एस टी डी बुथ परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर...

उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ सेवा वेळेत बदलयोग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणी आता सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत.

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २७: जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच पक्की अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.  सदर सेवा सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत आणि दुपारी ४.०० ते ६.०० वाजेपर्यंतच उपलब्ध राहणार आहे. दुपारी १२.०० ते ४.०० या कालावधीत तीव्र उष्णतेमुळे सर्व प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून संरक्षण मिळावे, तसेच सेवा घेणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. किरण मोरे यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घेऊन नियोजन करावे व संबंधित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान

इमेज
‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश गडचिरोली, (जिमाका) दि. २७: जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता शासकीय यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते. विविध योजनांचा घेतला सविस्तर आढावा बैठकीत खासदार डॉ. किरसान यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने: प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :...