पोस्ट्स

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या - जिल्हाधिकारीसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २८ : सेवा हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक, वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थितांना शपथ देत सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी यावेळी सांगितले की, शासनाच्या विविध सेवा निर्धारित कालमर्यादेत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. सेवांमध्ये कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे. प्रामाणिकपणा, निःस्वार्थी वृत्ती आणि संवेदनशीलता या मूल्यांच्या आधारे काम केल्यास नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवांमध्ये पारदर्शकता राखणे, वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे तसेच लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला...

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

गडचिरोली, (जिमाका) दि.२८: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) नवी दिल्ली यांच्यामार्फत NEET (UG) -२०२६ ही परिक्षा दिनांक ०३ मे २०२६ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यत जिल्हा मुख्यालयातील विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षा केंद्रावरील परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या २०० मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे. निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एस टी डी बुथ परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर...

उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ सेवा वेळेत बदलयोग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणी आता सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत.

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २७: जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच पक्की अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.  सदर सेवा सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत आणि दुपारी ४.०० ते ६.०० वाजेपर्यंतच उपलब्ध राहणार आहे. दुपारी १२.०० ते ४.०० या कालावधीत तीव्र उष्णतेमुळे सर्व प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून संरक्षण मिळावे, तसेच सेवा घेणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. किरण मोरे यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घेऊन नियोजन करावे व संबंधित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान

इमेज
‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश गडचिरोली, (जिमाका) दि. २७: जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता शासकीय यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते. विविध योजनांचा घेतला सविस्तर आढावा बैठकीत खासदार डॉ. किरसान यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने: प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :...

देशातील पहिली डिजिटल जनगणना-२०२७; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : भारतातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून ओळखली जाणारी जनगणना-२०२७ ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून, यात स्वगनेच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, टप्पा १ – घरयादी व घरगणना दि. १६ मे २०१६ ते १४ जून ३०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर टप्पा २ – लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अचूक व विश्वसनीय माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-गणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. ही सुविधा दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारी Self Enumeration ID (SE ID) जतन करून ठेवणे आवश्यक असून, प्रगणक घरी आल्यावर ही ID त्यांना देणे बंधनकारक राहणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागाती...

उद्योगात प्रत्यक्ष कामाची तरुणांना संधी, पंतप्रधान इंटर्नशीन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात.

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : भारताच्या माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेंतर्गत “ पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची “ घोषणा केलेली आहे.सन २०२६ -२७ मध्ये या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून, देशभरात ३१ हजार ४८० तरुणांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, वाहननिर्मिती, औषधनिर्माण, उत्पादन, माध्यम, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यप्रशिक्षण उपलब्ध आहे.या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून, प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांची शैक्षणिक पात्रता दहावीपासून बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशी असावी.  पू...

गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची ‘खरीप हंगामपूर्व कार्यशाळा २०२६’ उत्साहात संपन्न

इमेज
रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : कृषी विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPC) एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आगामी खरीप हंगामाचे नियोजन, हवामान बदल आणि शाश्वत शेती पद्धतींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शन आणि आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती प्रिती हिरळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ उभी करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, युरीया आणि डीएपी (DAP) सारख्या रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी सेंद्रिय स्व निर्मित खतांवर भर द्यावा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा. जैविक निवीष्ठा संसाधन केंद्र (BIRC) मार्फत निर्मित निविष्ठांचा वापर करण्यावर भर देत, 'एल निनो' (Al Nino) सारख्या हवामान बदल...