पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादीत नाराजीचे सुर - मनिष भाऊ दुर्गे यांचे खच्चीकरणाचा आरोप.

इमेज
एटापल्ली दि-24/07/2025 -  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये 500 कार्यकर्त्यांसह प्रवेश करूनही, मनीष भाऊ दुर्गे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आज एटापल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. सदर बैठकीत सहभागी कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "विधानसभा निवडणुकीत गावोगावी जाऊन आम्ही आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी झटून प्रचार केला. मात्र, आमच्या नेत्याला तालुका कार्यकारिणी अध्यक्ष पदावरून कटकारस्थान करून हटवले गेले, यामुळे आम्ही खचलेलो आहोत." बैठकीत पक्षातील अंतर्गत दुजाभाव, गटबाजी आणि कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्याच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी भावनिक स्वरात सांगितले की, "नेतृत्वावर अन्याय झाला, तर आमचे भवितव्य काय?" या बैठकीत पुढील भूमिका ठरवण्यासाठी एकमताने पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमाची शक्यता वर्तवण्यात आली. उपस्थितांनी ठामपणे सांगितले की, पक्षाकडून जर न्याय मिळाला नाही, तर आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही...

गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथील लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन.

इमेज
दिनांक:- २२ जुलै २०२५ गडचिरोली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन झालेले प्रकल्प: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हेडरी येथील ५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, हेडरी ते कोनसरी अशी ८५ किलोमीटर लांबीची आणि १० मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाइपलाइन आणि कोनसरी येथील ४ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा पेलेट प्रकल्प यांचे उद्घाटन झाले. हे प्रकल्प लॉयड्स मेटल्सच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ करतील. भूमिपूजन झालेले प्रकल्प: यावेळी कोनसरी येथील ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकात्मिक स्टील प्रकल्प (Integrated Steel Plant), कोनसरी येथील १०० खाटांचे रुग्णालय, कोनसरी येथील सीबीएसई शाळा आणि सोमनपल्ली ये...

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

इमेज
छल्लेवाडा (ता. अहेरी, जि. गडचिरोली) दि-19/07/2025 – महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करून तब्बल ३० वर्षे उलटली असताना, अजूनही अनेक गावांमध्ये अवैधरित्या दारू तयार करून खुलेआम विक्री केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर छल्लेवाडा येथील महिला प्रतिनिधींनी गावातील वाढत्या अवैध दारू विक्रीविरोधात उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, काही व्यक्ती गावातच साखर व गुळाचा वापर करून घरगुती पद्धतीने दारू बनवत असून, याशिवाय बाहेरगावाहूनही कंपनीत तयार होणारी दारू बेकायदेशीररीत्या आणून विक्री केली जात आहे. यामुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, कौटुंबिक कलह, महिलांवर अत्याचार, शिवीगाळ आणि वृद्ध नागरिकांवर मारहाणीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. महिलांनी आपल्या निवेदनात मागणी केली आहे की, गावामध्ये अवैधरीत्या तयार आणि बाहेरून आणली जाणारी दारू तात्काळ बंद करण्यात यावी. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. तसेच गावात पोलीस ग...

गावागावांत पसरले घाणीचे साम्राज्य; मल्लेरा ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ.मुलचेरा तालुक्यात चाललंय तरी काय ?

इमेज
मुलचेरा:तालुक्यातील मल्लेरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावांत अस्वच्छता,सांडपाणी आणि कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यांची सफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.विशेष म्हन्हे ग्रामपंचायत प्रशासनाने जबाबदारी झटकल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. किंबहुना रुग्ण दगावत आहेत. हिवतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे.आरोग्य विभाग डोळ्यात तेल टाकून सेवा देत आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबविताना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः लक्ष देऊन आहेत. मात्र,ग्रामपंचायत कार्यालय स्वतः आपल्या अधिनिस्त गावांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत असेल तर गावकऱ्यांनी काय करावं ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मल्लेरा ग्रामपंचायत अंतर्गत मल्लेरा, मोहूर्ली,रेंगेवाही,लोहारा,कोडसापूर, गंगापूर रिट आदी...

रस्त्यावरील खड्डे आणि अपघातांवर जिल्हाधिकारी पंडा यांचा 'ॲक्शन प्लॅन'; दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

इमेज
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठकीत खड्डे दुरुस्तीपासून ते ट्रॉमा युनिटपर्यंत व्यापक उपाययोजनेवर चर्चा. गडचिरोली, दि.15 : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले असून, कामात दिरंगाई झाल्यास किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास संबंधित यंत्रणांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात श्री पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषीकांत राऊत आणि यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. खड्डेमुक्त रस्त्यांची जबाबदारी यंत्रणेची पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर व्हायला हवी असे श्री पंडा यांनी स्पष्ट करून सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा इतर ज्या यंत्रणेच्या अखत्यारीत र...

गट्टा ते सुरजागड रस्त्याच्या दयनीय अवस्थेवरून भाकपाचा सरकारला इशारा!

इमेज
एटापल्ली, 15 जुलै 2025 (टाईम्स ऑफ गडचिरोली): गटटा ते सुरजागड दरम्यानचा सुमारे ३० वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला मुख्य रस्ता आज मृत्यूच्या दारापर्यंत पोहचला आहे. यानंतर या मार्गाकडे शासनाने डोळा फिरवलाच नाही. खड्ड्यांनी भरलेला हा रस्ता आज गावकऱ्यांसाठी संकट बनला असून, रोजच्या रोज अपघात होत असून रुग्णवाहिका वेळेत पोहचू शकत नाही. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागतंय. "हा विकास आहे की शोषण?" असा जळजळीत सवाल करत भाकपाच्या राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी तीव्र शब्दांत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "आम्हाला केवळ आश्वासनं मिळाली, विकास नाही. जल, जंगल आणि जमिनीच्या नावावर भांडवलदारांचे हितसंबंध वाढवले जात आहेत, तर स्थानिक जनता मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करतेय. ही व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे." ग्रामस्थांचा आक्रोश : गटटा, जांबिया, गर्देवाडा, मेंढरी, वांगेतुरी अशा गावांतील ग्रामस्थांनी शेकडो वेळा निवेदने दिली आहेत, पण अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही झाली नाही. वाहनचालक, दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. रुग्णवाहिका वेळेवर ...

एटापल्ली नगर पंचायतच्या निष्क्रीय जलशुद्धीकरण संयंत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. मनिष दुर्गे यांचा हल्लाबोल; चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी.

इमेज
एटापल्ली दिनांक 14/07/2025 – एटापल्ली नगर पंचायत हद्दीतील १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेली सुमारे ७० लाख रुपयांची जलशुद्धीकरण संयंत्रे सध्या निष्क्रिय आणि काही ठिकाणी गायब झाल्याने स्थानिक नागरीकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष श्री मनिष दुर्गे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे चौकशीसाठी लेखी तक्रार सादर केली आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत २०१९-२०२० मध्ये १० जलशुद्धीकरण यंत्रे प्रत्येकी ७ लाख खर्च करून बसविण्यात आली होती. मात्र सध्या बहुतांश संयंत्रे धुळखात पडलेली असून, काही ठिकाणी तर पूर्णतः अदृश्य झाली आहेत. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नसून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. श्री. दुर्गे यांनी आपल्या निवेदनात कंत्राटदाराची ५ वर्षांची देखभाल जबाबदारी असूनही नगर पंचायतने कोणतीही देखभाल करून घेतलेली नाही, तसेच यंत्रे गहाळ झाल्याबद्दल कोणतीही पोलिस तक्रार दाखल न झाल्याची गंभीर बाब उपस्थित केली आहे. विशेषतः प्रभाग क्र. २ (गोटुल भवन, जिवनगट्टा) येथील संयंत्राजवळ नाली घाणीने भर...

काँग्रेस नगराध्यक्ष व नगरसेवकांनीच काँग्रेस खासदारांचा आदेश झुगारला? शौचालय प्रश्नावरून टाळा खोलो आंदोलनाची चेतावनी..

इमेज
एटापल्ली   (जि. गडचिरोली)  एटापल्ली नगरपंचायतमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असून, नगराध्यक्षही काँग्रेसच्या आहेत. मात्र तरीही स्वतःच्याच पक्षाच्या खासदारांच्या स्पष्ट आदेशालाही काँग्रेस नगरसेवक व नगराध्यक्षांनी दुय्यम स्थान दिले.असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेले बसस्थानकावरील सार्वजनिक शौचालय अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे अखिल भारतीय महिला फेडरेशनने टाळा खोलो आंदोलन  उभारण्याचा इशारा दिला आहे. खासदारांचा आदेश तरीही दुर्लक्षित. महत्वाचे म्हणजे, एका वर्षापूर्वी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीदरम्यान काँग्रेसचे खासदार स्वतः उपस्थित होते.या बैठकीत सर्व काँग्रेस नगरसेवक स्टेजवर व काही खाली बसलेले होते. त्या बैठकीत खासदारांनी थेट मुख्याधिकारी यांना शौचालय १५ दिवसांत सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते आणि हे सगळं जनतेसमोर खुले आम घडलं. त्यांच्याच पक्षाच्या आदेशालाही किंमत नाही? हे दृश्य डोळ्यांनी पाहिल्यानंतर देखील वर्षभरात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे काँग्रेस नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रशासनावर प्रभावही टाकू ...

गोटूलचा अपमान सहन करणार नाही. ऑल इंडिया आदिवासी महासभा आक्रमक प्रशासनाकडे केली कार्यवाहीची मागणी.

इमेज
एटापल्ली, ता. १२ जुलै  एटापल्ली शहरातील पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक केंद्र गोटूल मध्ये जनावरं ठेवण्यात आल्याच्या घटनेनं आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराचा कम्युनिस्ट पक्षाची जनसंघटना ऑल इंडिया आदिवासी महासभेच्या वतीने आज उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला. गोटूल ही आमच्या श्रद्धेची, परंपरेची व सामाजिक एकतेची जागा असून तिथे धार्मिक विधी, समाज चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा पवित्र ठिकाणी जनावरं ठेवणं म्हणजे आदिवासी अस्मितेवर थेट घाव आहे असं मत तालुका संयोजक कॉ.अश्विनी कंगाली  यांनी व्यक्त केलं. महासभेने प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. 1. दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. 2. गोटूलची तात्काळ स्वच्छता करून सांस्कृतिक पवित्रता पुनर्संचयित करावी. 3. अशा घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी. 4. आदिवासी समाजाची अधिकृतरीत्या माफी मागावी. या घटनेने पुन्हा एकदा आदिवासी परंपरांवर होणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून," निषेध! निषेध! निषेध! "अशा घोषणांनी कार्यालय पर...

एटापल्ली-भामरागडमध्ये शासकीय रेती डेपो सुरू करा – भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शासनाकडे जोरदार मागणी.

इमेज
शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर कॉ. सचिन मोतकुरवार यांचा संतप्त सवाल. एटापल्ली/गडचिरोली – एटापल्ली व भामरागड तालुक्यांतील स्थानिक नागरिकांना कायदेशीर मार्गाने रेती मिळावी यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शासकीय रेती डेपो तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी पक्षाचे जिल्हा सहसचिव व राज्य उपाध्यक्ष (AIYF) कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. मात्र, या मागणीला उत्तर देताना गडचिरोलीचे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी स्पष्ट केले की, सध्या शासकीय रेती डेपो सुरू करता येणार नाही, कारण संबंधित रेती घाटांचा लिलाव होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केवळ लिलाव पार पडलेल्या अधिकृत रेती घाटांमधूनच रेती उपलब्ध करून देता येते. या उत्तरावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कॉ. मोतकुरवार म्हणाले, “एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात खदानी सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. जंगलात मोठ्या प्रमाणावर खाणकाम चालते आहे, जमीन उद्योगपतींना विकली जाते. मग गरीबांसाठी शासकीय रेती डेपो सुरू करणं इतकं कठीण का वाटतं? शासन निर्णय दाखवला जातो, पण अंमलबजावणी होत नाही. ही ...

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचले, पण शेवटचा श्वास घेता घेता हरणाचा मृत्यू…!

इमेज
अहेरी (जिल्हा गडचिरोली) - अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे असलेल्या वाहतूक व विपणन बल्लारशहा वनपरिक्षेत्र अधिकारी, मध्यवर्ती काष्ठ भांडार आगार क्र. 03 आलापल्ली या डेपो परिसरात एक हरण मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटनेनंतर डेपोमध्ये कार्यरत वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले. लगेचच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भोयर यांच्याशी संपर्क साधून उपचारासाठी बोलावले. डॉक्टरांनी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र हरणाला वाचवण्यात यश आले नाही आणि त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी पंचनामा करून नैसर्गिक नियमांनुसार, मृत हरणाचे शव जंगलातच विधीपूर्वक जाळून नष्ट करण्यात आले. यावेळी वनपाल जंबोजवार, परिचर निलेश गंगावने, तसेच अन्य वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 10 जुलै 2025 रोजी दहन प्रक्रिया Forest Depot No. 3 मध्ये पार पडली. ही घटना वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी चिंता व्यक्त करणारी असून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.

इमेज
 अहेरी :-, १० जुलै २०२५ – अहेरी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनविकास महामंडळाच्या (FDCM) दोन कर्मचाऱ्यांनीच हरिणाची शिकार करून मटन शिजवून खाल्ल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा वन विभागाच्या पथकाने कारवाई करत दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. सदर कारवाई आलापल्ली वनविभागाच्या हद्दीत करण्यात आली असून, ही घटना वनविकास महामंडळावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही ज्या विभागाची प्रमुख जबाबदारी आहे, त्याच विभागातील कर्मचाऱ्यांकडून अशी बेकायदेशीर व अमानुष कृत्ये घडत असतील तर सामान्य जनतेने विश्वास ठेवावा तरी कुणावर, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. प्राप्त माहितीनुसार, अटक केलेले दोघे कर्मचाऱ्यांपैकी एक कंत्राटी असून या प्रकरणात इतर कर्मचारीही सामील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र जबाबदारी टाळण्यासाठी हा प्रकार एका कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या नावावर लादण्याचा प्रयत्न FDCMच्या अंतर्गत काही अधिकाऱ्यांकडून होत असल्याचेही बोलले जात आहे. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांनी पदभार स्वीकृत...

अतिदुर्गम देचलीपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रास भाग्यश्रीताई यांची आकस्मिक भेट, परिस्थितीचा घेतला आढावा.

इमेज
देचलीपेठा, दिनांक -07/07/2025 :- माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देचलीपेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आकस्मिक भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली आणि जिल्ह्यात थैमान घातलेल्या मलेरिया परिस्थितीचा आढावा घेतला.  शेवटच्या टोकापर्यंत आरोग्य व्यवस्था चांगली राहावी आणि प्रत्येक माणसाला योग्य आणि वेळेत उपचार मिळावा असे प्रयत्न करा असे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम डांगे तथा कर्मचाऱ्यांना केली. एका नुकत्याच प्रसूती झालेल्या महिला सौ. सुजाता अविनाश मडावी (गाव सिंधा) तथा तिच्या नवजात कन्येची पाहणी केली. यावेळी उपस्थित डॉ शुभम डांगे, एल. टी. उइके आरोग्य सेविका, ममिता गावडे, स्वप्नील धुर्वे, मुकुंदा तेलम, मोहन दुर्ग, विनोद कुमरे, रुपेश करेनगुलवार, इस्माईल दादा, श्रीनिवास विरगोनवार, अफसर खान,सुमित मोतकुरवार यावेळी उपस्थित होते.

चपराळा अभयारण्याजवळ महामार्गाची चाळण, लोह खनिजाच्या अतिभार वाहतुकीमुळे रस्ता उध्वस्त; विद्यार्थी व नागरीक त्रस्त!

इमेज
गडचिरोली (मु.सं) - दिनांक - 07 जुलै 2025 :- गडचिरोली जिल्ह्यातील लगाम नाका ते नागेपल्ली या सुमारे 25 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C चा अक्षरशः कणा मोडलेला असून, रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या मार्गावरून लायड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या जड वाहनांतून मोठ्या प्रमाणावर लोहखनिजाची अतिभार वाहतूक सुरू असून, त्यामुळे रस्त्यावर मोठाले खड्डे तयार झाले आहेत. सदर खड्ड्यांमुळे प्रवाशांचे व स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणे म्हणजे मृत्युच्या खाईत उतरण्यासारखे झाले आहे. सदर महामार्ग चपराळा वन्यजीव अभयारण्याच्या प्रवेशद्वारालगतून जातो. हा मार्ग वन्यजीव संरक्षित क्षेत्र, शालेय वाहतूक, रुग्णवाहिका आणि खाजगी वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, लायड मेटल अँड एनर्जी लि. कंपनीच्या जड वाहनांद्वारे होणाऱ्या लोहखनिजाच्या अतिभार वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या शालेय वाहने, रुग्णवाहिका, खासगी व शासकीय वाहने यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र रस्त्याची अवस्था पाहता अपघाताची...

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

इमेज
वेलगुर (ता. अहेरी, जि. गडचिरोली), दि. ०४ जुलै २०२५ रोजी दुपारी-१२.३० वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील वेलगुर टोला वळणाजवळ एक भीषण अपघात घडला. सुरजागड खाणीतून लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक (MH-३४ BZ-६८०२) आणि स्कॉर्पिओ (MH-३३ Y-९९९१) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः समोरील उजव्या बाजूचा चक्काचूर झाला. सदर स्कॉर्पिओ गाडी अमीत येनपेरेड्डीवार यांची असून, ते स्वतः चालक होते. त्यांच्या सोबत विशेष भटपलीवार हे देखील गाडीत होते. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची वेगमर्यादा, ओव्हरलोडिंग व रस्त्याची धोकादायक स्थिती हे संभाव्य कारण म्हणून स्थानिकांकडून चर्चिले जात आहे.

थेट जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकाराची मोठी झेप! मारोती कोलावार यांची 'खबरदार महाराष्ट्र'च्या संपादकपदी वर्णी.

इमेज
मारोती कोलवार यांची खबरदार महाराष्ट्र न्यूज़ मध्ये  संपादकपदी वर्णी गडचिरोली;- अतिदुर्गम, अतिमागास आणि संधींपासून वंचित अशा गडचिरोली जिल्ह्यातून आपल्या ठोस आणि थेट बातमी शैलीतून नागरिकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवणारे तेजतर्रार पत्रकार मारोती कोलावार यांची आता 'खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क'च्या संपादकपदी वर्णी लागली आहे. कोलावार यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केवळ बातम्या नव्हे, तर एक चळवळ निर्माण केली. आदिवासी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत, विविध प्रशासकीय यंत्रणांना जागं करणारी पत्रकारिता त्यांनी सातत्याने केली. त्यांच्या नेतृत्वाखाली 'खबरदार महाराष्ट्र' अधिक सक्षम, ठोस आणि जनतेशी बांधिलकी ठेवणारा माध्यम मंच बनेल, असा विश्वास अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 'खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क'ने अल्पावधीतच ग्रामीण भागात विश्वासार्हता मिळवलेली असताना, आता संपादक म्हणून मारोती कोलावार यांच्या आगमनामुळे हे माध्यम अधिक ताकदीने जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज होईल, अशीच चर्चा सुरू आहे. थेट, निर्भीड आणि अस्सल पत्रकारितेच्य...

गोमनी येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद.भारतीय मानवाधिकार परिषदेचा इशारा.

इमेज
गोमनी;- गोमनी गावात स्थापन करण्यात आलेला पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः बंद अवस्थेत आहे. वर्षभर हा दवाखाना बंद असून येथे नियुक्त असलेला शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी नियमित अनुपस्थित राहतो विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर कोणतीही जबाबदारी पार न पाडता शासनाकडून नियमित पगार घेत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आणि निषेधार्त आहे.वर्षानुवर्षांपासून या दवाखाण्यात भौतिक सुविधांचा देखील अभाव आहे. सध्या पावसाळा सुरु असून शेतीची कामे युद्धपातळीवर सुरु आहे.या पावसाळ्यात वेगवेगळ्या बिमारीने पशुधन देखील मोठ्या प्रमाणावर आजारी पडण्याची शक्यता नाकारता येतं नाही . जनावरांना अपघात, जखमा किंवा रोग झाल्यास उपचारासाठी ग्रामीण भागात पर्यायच उरत नाही. अशा परिस्थितीत गोमनी परिसरातील शेतकरी आणि पशुपालक यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दवाखाना असूनही सेवा मिळत नाही, यामुळे शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या निष्क्रियतेविरोधात भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वदीप वाळके यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. "संबंधित डॉक्टरवर ...

गोमनी येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद. डॉक्टराचा पगार मात्र सुरु हे चालले तरी काय ? शासन काय करत आहे.गावांतील नागरिकांना पडला प्रश्न.

भारतीय मानवाधिकार परिषदेचा इशारा. गोमनी;- गोमनी गावात स्थापन करण्यात आलेला पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः बंद अवस्थेत आहे. वर्षभर हा दवाखाना बंद असून येथे नियुक्त असलेला शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी नियमित अनुपस्थित राहतो विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर कोणतीही जबाबदारी पार न पाडता शासनाकडून नियमित पगार घेत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आणि निषेधार्त आहे.वर्षानुवर्षांपासून या दवाखाण्यात भौतिक सुविधांचा देखील अभाव आहे. सध्या पावसाळा सुरु असून शेतीची कामे युद्धपातळीवर सुरु आहे.या पावसाळ्यात वेगवेगळ्या बिमारीने पशुधन देखील मोठ्या प्रमाणावर आजारी पडण्याची शक्यता नाकारता येतं नाही . जनावरांना अपघात, जखमा किंवा रोग झाल्यास उपचारासाठी ग्रामीण भागात पर्यायच उरत नाही. अशा परिस्थितीत गोमनी परिसरातील शेतकरी आणि पशुपालक यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दवाखाना असूनही सेवा मिळत नाही, यामुळे शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या निष्क्रियतेविरोधात भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वदीप वाळके यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. ...