पोस्ट्स

बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक

इमेज
आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याची गरज;आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर विचारार्थ पालकांच्या पालन-पोषणाला कायदेशीर बळ देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार मुंबई - “मातृदेवो भव, पितृदेवो भव” ही मूल्ये केवळ शब्दांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनात रुजली पाहिजेत. आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे नैतिक कर्तव्य असले, तरी बदलत्या सामाजिक परिस्थितीत या मूल्यांना कायद्याची जोड देण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आई-वडिलांच्या सन्मान आणि संरक्षणासाठी अशासकीय विधेयक सभागृहात विचारार्थ ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या संस्कृतीत भगवान श्रीगणेशांनी पृथ्वीची प्रदक्षिणा न घालता माता पार्वती आणि भगवान शंकरांना प्रदक्षिणा घालून आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज,श्रावणबाळ आणि ययाती यांच्या जीवनातूनही आई-वडिलांप्रती असलेले अपार प्रेम आणि कर्तव्यनिष्ठा आपल्याला शिकायला मिळते. मात्र आजच्या काळात या संस्क...

जिल्ह्यात १४ मार्च रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' नागरिकांच्या महसुली समस्यांचे एकाच छताखाली निराकरण

गडचिरोली,(जिमाका)दि.१३: महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी शासनातर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी, १४ मार्च २०२६ रोजी मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. येत्या १४ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बाम्हणी (ता. गडचिरोली), पेरमिल्ली (ता. अहेरी), येणापूर (ता. चामोर्शी), देऊळगाव (ता. आरमोरी), मालेवाडा (ता. कुरखेडा), बेळगाव (ता. कोरची), पेंटीपाका (ता. सिरोंचा), ताडगाव (ता. भामरागड), सुरसुंडी (ता. धानोरा) व कोटमी (ता. एटापल्ली) या महसूल मंडळांचा समावेश आहे. त्यानंतरही १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे, १५ मे या नियोजित तारखांना...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी: २२ व्या हप्त्याच्या लाभासाठी गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार शेतकरी पात्र

इमेज
गडचिरोली,(जिमाका)दि.१३: अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेचा २२ वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते, याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर तसेच जिल्ह्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील लाभार्थ्यांची स्थिती आणि २२ वा हप्ता पी.एम. किसान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी देय असलेल्या २२ व्या हप्त्याकरिता एकूण १ लाख ५४ हजार पात्र शेतकरी निश्चित करण्यात आले आहेत. यातील शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) निधी वितरित करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील वितरण: चालू आर्थिक वर्षात २० व्या हप्त्यापोटी ७७,७१८ शेतकऱ्यांना १५ कोटी ५४ लाख ३६ हजार रुपये आणि २१ व्या हप्त्यापोटी ४४,२५० शेतकऱ्यांना ८ कोटी ८५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत....

रब्बी हंगाम सन 2025-26 या वर्षाची रब्बी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर

इमेज
गडचिरोली,(जिमाका)दि. १३ :  गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६९८ गावे असून रब्बी पिकाची गावे १४८ आहेत. त्यापैकी रब्बी गावांमध्ये पीके नसलेली गांवे ८८ आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले रब्बी गावे ० असून ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या ६० आहेत. अशा प्रकारे एकूण ६० गावांमधील रब्बी पिकाची सुधारीत पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची रब्बी पिकाची २०२५-२०२६ या वर्षाची सुधारीत पैसेवारी ही ०.६७ रु.पै. आहे. असे जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

थ्रोबॉल या क्रीडा प्रकाराच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा आयोजन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सत्र २०२५-२६ या वर्षात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. थ्रोबॉल या क्रीडा प्रकाराच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा (१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली) दि. २० ते २१ मार्च, २०२६ रोजी सकाळी ०८.०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे करण्यात येणार आहे. त्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील इक्छुक शाळा/महाविद्यालयातील खेळाडूंनी स्पर्धेत सह्भागाकरीता दि. १८ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज भरून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदणी करावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. 

जिल्हयातील सर्व जिल्हा पशुचिकित्सालय, तालुका पशुचिकित्सालय, पशुवैद्यकीय चिकित्सालय व फिरते पशुचिकित्सालय यांचे कामकाजाच्या सुधारीत वेळा जाहिर

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. १३ : राज्यातील सर्व जिल्हा पशुचिकित्सालय, तालुका पशुचिकित्सालय, पशुवैद्यकीय चिकित्सालय (स्थानीक) व फिरते पशुचिकित्सालय यांचे कामकाजाचे वेळा निश्चित करणेबाबत विभागाकडुन शासन निर्णय दिनांकक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित झाले,            पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडुन कृत्रिम रेतन, कृत्रिम रेतनाव्दारे जंन्मलेली वासरे, गर्भधारणा तपासणी , वंधत्व निवारण उपचार , लसीकरण , औषधेपचार व शस्त्रक्रिया या सारख्या तांत्रिक सेवा पुरविण्यात येतात. राज्याच्या पशुजन्य उत्पादनात वाढ घडवुन आणण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची वाटचाल पशुउदयोजकतेकडे करणे आवश्यक असुन त्या माध्यमातुन रोजगार निर्मीती व स्वंय रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. योजना व कार्यक्रमाचे माध्यमातुन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रात रोजगार निर्मीती व स्वंय रोजगार या साठी प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमाचे माध्यमातुन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रात उदयोजकता निर्माण करुन शेतकरी व पशुपालाकांचे उत्पन्न वाढविण्या...

१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

इमेज
मुंबई, दि. १३ मार्च:  ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.