पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती.

इमेज
मुंबई, दि. 30 : राज्यातील महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी उच्च  व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, इन्फोसिसचे तिरूमला आरोही, संतोष अंनदापुर, किरण एम. जी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वाचे पाऊल टाकले आहे. देशात पहिल्यांदाच इन्फोसिस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य कर...

ज्येष्ठ पत्रकार व आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट.

इमेज
नवी दिल्ली, 30 :    ज्येष्ठ पत्रकार व आपत्ती  व्यवस्थापन तज्ज्ञ  जयपाल पाटील यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.                                     परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा  यांनी  श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार, आ‍काशवाणी दिल्लीच्या क्रीडा विभागाचे प्रोग्राम एक्जीक्युटीव्ह नितीश अरोडा यावेळी उपस्थित होते.             दिल्ली आयआयटी  परिसरात  24 ते 27 नोव्हेंबर 2021 दरम्यान आयोजित 5व्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेत श्री. पाटील सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या या परिषदेत श्री. पाटील यांनी  ‘होफफुल टुमारो’ या विषयावर शोध निबंध सादर केला. या परिषदेत सादर केलेल्या शोध निबंधाविषयी  त्यांनी यावेळी माहिती  दिली  व अनुभव कथन केले.        ...

सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांना प्रवेश.

इमेज
जिल्हा प्रशासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचीही तरतूद. गडचिरोली दि.30 :  राज्यांतील कोविड- 19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये, निरंतर व सातत्याने घट होत आहे. आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड 19 विषयक निर्बधांचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त बाळगण्यामुळे यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेता, पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी संदर्भिय पत्रान्वये राज्य शासनाने  आर्थिक,  सामाजिक,  मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंधाना शिथीलता देण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे. त्यानुसार संजय मीणा, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली, यांनी साथरोग प्रतिबं...

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चिंतारेव, कुर्ता गांवात जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा दौरा.

इमेज
इंद्रावती नदीच्या मधोमध वसलेला कुर्ता गांवात नावेने (डोंग्यानी) प्रवास करावे लागते. दिक्षा झाडे-  तालुका प्रतिनिधी एटापल्ली अहेरी :- अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असलेल्या गावातील नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करून देऊन विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्याच्या दूरदृष्टी बाळगुन  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ग्रामीण परिसरात जाऊन समस्या जाणून घेत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक ग्रामीण भागात दौरे करून समस्यांचे निराकरण करत आहेत.              महाराष्ट्र व छत्तीसगढ़ सीमेवरील गडचिरोली जिल्हातील शेवटच्या टोकावर असलेले अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या चिंतारेव गाव हा इंद्रावती नदीच्या काठावर वसलेले आहे.           तर कुर्ता हे गाव इंद्रावती नदीच्या मधोमध म्हणजे इंद्रावती नदीच्या पाण्याच्या प्रवाह सदर गावाजवळ दोन दिशांनी वाहत असुन मधोमध बेट निर्माण झाले आहे. याठिकाणी सहा कुटुंब पारंपरिक शेती करत उदरनिर्वाह करत असुन परिस्थिती मात्र जीवघेणा आहे. सदर कुर्ता गांवात जा...

रमाई आवास योजना : राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य शासनाची मंजुरी - धनंजय मुंडे.

         ·          पात्र असलेल्या प्रत्येकाला घरकुलाचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न - ना. मुंडे.          ·          सन 2021-22 च्या रमाई आवास घरकुल योजनेच्या उद्दिष्टास शासनाची मान्यता.              मुंबई , दि. 29  : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.            ...

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्या संदर्भात मान्यता - ग्राम विकास विभाग.

मुंबई : - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन  2248 इतकी होईल.  त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल. राज्य निवडणूक आयोग ,  जिल्ह्यातील निर्वाचक गटांतून थेट निवडणूकीद्वारे निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करील. तथापि ,  एखाद्या जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणूकीव्दारे भरवण्यात येणाऱ्या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण ,  शक्य असेल तेथवर ,...

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ - ग्राम विकास विभाग.

मुंबई :- २९   नोव्हेंबर  २०२१ ग्रामपंचायत ,  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. ग्रामपंचायत ,  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10 च्या पोट कलम (1क) आणि 30-1क आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 12 (क) ,  42 (6-क) ,  67 (7-क) मधील तरतुदीनुसार निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर 2022 किंवा त्यापूर्वीचा असेल.  मात्र ,  नामनिर्देशन भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज क...

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश.

इमेज
लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश. 'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही.   मुंबई , दि. 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पा...

“वखार आपल्या दारी, वखार महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण अभियानाचे” कार्यशाळा संपन्न.

इमेज
गडचिरोली ,  दि. 26  : एकदिवशीय   शेतकरी   कार्यशाळा   महाराष्ट्र   राज्य   वखार   महामंडळाच्या   शेतमाल   साठवणुकीच्या   विविध   योजनांचा   लाभ   थेट   शेतकऱ्यांना   व्हावा  , यासाठी   महाराष्ट्र   राज्य   वखार   महामंडळ  ,  कृषी   विभाग   व   महाराष्ट्र   सहकार   विकास   महामंडळ   मर्यादित   यांचा   संयुक्त   विद्यमाने   “   वखार   आपल्या   दारी ,  महामंडळाचे   वचन   शेतमाल   संरक्षण   अभियान ”   या   अंतर्गत   शेतमाल   तारण   योजनेची   शेतकऱ्यांना   माहिती   मिळावी   याकरिता   दि . 25  नोव्हेबर  2021   रोजी   एक   दिवशीय   कार्यशाळेचे   आयोजन   महाराष्ट्र   राज्य   वखार   महामंडळ  , गडचिरोली .  या   वखार   केंद्रावर   करण्यात   आले ...

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा.

इमेज
गडचिरोली ,  दि. 26 :   संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी सुरेश जाधव,  यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले . यावेळी, निवासी उप जिल्हाधिकारी धनाजी पाटील, तहसिलदार, श्री. रामटेके, नायब तहसिलदार,किशोर भांडारकर, लेखाधिकारी बोरसरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, श्री.टेभूर्णे, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे,  जिल्हा माहिती कार्यालय, मनोहर बेले, श्री.चहांदे, श्री. भैसारे आदी उपस्थित होते .  उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले . तसेच संविधान दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गांनी  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

गडचिरोली ,  दि. 26 :    राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दि. 17 नोव्हेंबर 2021 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता, किंवा इतर कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत आवलमरी (प्रभाग -3), राजाराम (प्रभाग -1,2,3), पेठा (प्रभाग-1,2), मरपल्ली (प्रभाग-1,2), मेडपल्ली (प्रभाग-3), रेपनपल्ली (प्रभाग-5), खमनचेरु ( प्रभाग-2,4), देवलमरी (प्रभाग-3), किष्टापुर वेल ( प्रभाग-1), कमलापुर (प्रभाग-2), पल्ले (प्रभाग-1,3), येडमपल्ली (प्रभाग-1), किष्टापुर दौड (प्रभाग-1), व वट्रा खुर्द (प्रभाग-2), येथील रिक्त सदस्य पदाच्या पोटनिवडणूकांकरीता पारंपारिक पद्धतीने निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. तहसिलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी कार्यालय, अहेरी यांचे दिनांक 22 नोव्हेंबर 2021 मधील मुद्दा क्र.3 मध्ये सुधारणा असून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशनानुसार सन 2020 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 4, दि. 11 मार्च 2020 अन्वये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमी देण्याचा मुभा संपुष्टात असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सन 1959 चा अधिनियम क्र.3 च्या कलम 10-अ मधील तरतुद...

गडचिरोली जिल्हयातील 9 नगर पंचायतीमध्ये आदर्श आचार संहिता लागू.

गडचिरोली ,  दि. 26 :    राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये गडचिरोली जिल्हयातील मुदत समाप्त झालेल्या  नगरपंचायती मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2021 परिशिष्ट-1 प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. त्यात गडचिरोली जिल्हयातील 9 नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुक नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलेचरा, धानोरा, कुरखेडा, व कोरची येथे आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या संदर्भीय आदेशातील परिशिष्ट-1 मधील टप्यानुसार नगरपंचायतींचे सार्वत्रिक निवडणूकीचा शेवटचा टप्पा मतमोजणी दिनांक 22 डिसेंबर, 2021 ( बुधवार) रोजी पार पाडण्यात येणार असून उक्त आदेशाच्या परिच्छेद 7 नुसार निवडणूकीची आचारसंहिता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 24 नोव्हेंबर,2021 पासून ते निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहणार आहे. आचार संहिता ही सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संपूर्ण संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लागू  राहणार असून क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्या...

गडचिरोली जिल्हयात दि. 27 नोव्हेंबर पासून 15 दिवस जमावबंदी.

गडचिरोली ,  दि. 25:  साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत.तसेच      दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात येत असून  काही राजकीय पक्ष ,  संघटना व इतर नागरिक उत्सव ,  सभा ,  मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक  27 . 1 1.2021  चे  00.01  वा. ते दिनांक  11 . 12 .2021  चे  24.00  वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम , 1951  चे कलम  37 (1)(3)  लागु  करण्यात आलेले आहे. त्यामुळे  सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी ,  गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम  1951  चे कलम  37 (1)  आणि ( 3)   अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक...

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करिता घरकुल लाभार्थी निवड व ग्रामसभांची प्रक्रिया सुरू.

गडचिरोली ,  दि. 25:  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण    या  2021-22  करिता घरकुल    मंजूर करण्याकरीता लाभार्थी निवड व ग्रामसभाची प्रक्रिया सुरू     झालेली आहे.   आवास प्लस सर्वेक्षण  ( प्रपत्र ड  )  मधील माहितीच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना  - ग्रामीणची    प्राधान्यक्रम यादी तयार करण्याबाबत शासनाचे दि. 30/08/2021  चे पत्रानुसार त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आवास प्लस सर्वेक्षणची माहिती वापरून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण करीता लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम यादया तयार करावयाचे आहे. प्राधान्यक्रम   यादी   अंतिम   करण्याची   प्रक्रिया   :-  आवास प्लस डेटाबेस मधील कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी करून अपात्र कुटुंबे वगळण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी  ( पंचायत समिती स्तरावरून समिती गठीत करून कार्यवाही करणे)  (Removal Of Ineligible Beneficiaries).  तालुकास्तरावरून अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना आवास सॉफट प्रणालीवर जिल्हास्त...

गडचिरोली जिल्हयात कोविड लसीकरण पहिला डोस 73.55 टक्के तर दुसरा 34.25 टक्के नागरिकांनी घेतला.

इमेज
जिल्हयात आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून  9  लक्ष डोस दिले. जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे नागरिकांना लसीकरणाचे आवाहन. गडचिरोली ,  दि.2 4 :   गडचिरोली जिल्ह्यात कोविड लसीकरणाला गती देण्याचे व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. जिल्हयातील  11.88  लक्ष लोकसंख्येपैकी  8.35  लक्ष पात्र नागरिकांना कोरोना लसीकरणाचे उद्दिरष्ट ठेवण्यात आले आहे. पैकी लशीचा पहिला डोस  6,14,141  नागरिकांनी घेतला आहे त्याची टक्केवारी  73.55  आहे.  तर दुसरा डोस  2,86,022  म्हणजेच  34.25  टक्के लोकांनी घेतला आहे. यामध्ये पहिला डोस  2,20,866  नागरिकांनी तर दुसरा डोस  5,48,985  नागरिकांनी घेणे बाकी आहे. पहिला व दुसरा डोस मिळून आत्तापर्यंत जिल्हयात  9,00,163  डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस घेण्यात लोकसंख्येच्या तुलनेत चामोर्शी  1,04,139  संख्येने आघाडीवर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तालुका  1,00,782  डोस घेणारा आहे. तिसऱ्या क...

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकांसाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दि.17 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू.

गडचिरोली ,  दि.2 4 :   राज्य निवडणूक आयोग,  महाराष्ट्र , मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक  17  नोव्हेंबर 2021  अन्वये  निधन राजीनामा, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त  झालेल्या ग्रामपंचायतमधील  आवलमरी ( प्रभाग-3), राजाराम (प्रभाग-1,2,3,), पेठा ( प्रभाग-1,2,), मरपल्ली (प्रभाग-1,2,), मेडपल्ली (प्रभाग-3), रेपनपल्ली (प्रभाग-5), खमनचेरु (प्रभाग-2,4,), देवलमरी (प्रभाग-3), किष्टापुर वेल,(प्रभाग-1), कमलापूर (प्रभाग-2), पल्ले(प्रभाग-1,3,), येडमपल्ली (प्रभाग-1), किष्टापुर दौड,(प्रभाग-1), व वट्रा खुर्द, (प्रभाग-2),  येथील रिक्त सद्स्य पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारीक पध्दतीने निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असून निवडणूकीचे टप्पे  व दिनांक पुढील प्रमाणे आहे.      नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसुचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिन...

गडचिरोली जिल्हयातील 9 नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर. अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शीचा समावेश.

गडचिरोली ,  दि. 24 :   विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर  यांच्या  22  नोव्हेंबर  2021  च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील   अहेरी, सिरोंचा, भामरागड,एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतीम आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अहेरी नगरपंचायतीमध्ये  अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 17, अनुसूचित जाती (स्त्री)करीता  प्रभाग क्रमांक 13, अनुसूचित जमातीकरीता 2, 7, तर  अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 4,9,16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 14, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1,3,5,8, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 6,10,11,12,15 जाहीर करण्यात आले आहे. सिरोंचा नगरपंचायतीमध्ये  अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जाती (स्...

औषधावरील आक्षेपार्ह जाहिरात प्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.

इमेज
मुंबई ,  दि.  23 : " मायफेअर क्रिम" चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि. ,  पोआंटा साहिब ,  हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर  ' त्वचेचा रंग उजाळते '  अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून  14  लाखांचा व नागपूर येथून  34  लाखांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा.रा. गहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा  1940  व नियम  106,  अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथे तर नागपूर येथे औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी साठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादुटोणा आदी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा  1954  व नियम  1955  आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा  1940  व नियम  1...

महाआवास अभियान – टप्पा 2 चा शुभारंभ, 5 लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.

इमेज
मुंबई ,  दि. 23 : गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ ,  असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला. महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-2 चा शुभारंभ आज ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला. या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,  अपर मुख्य सचिव राजेश कुमार ,  ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त ,  आदिवासी विकास आयुक्त ,  उपायुक्त (विकास) ,  जिल्हाधिकारी ,  मुख्य कार्यकारी अधिकारी ,...