ज्येष्ठ पत्रकार व आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट.

नवी दिल्ली, 30 :   ज्येष्ठ पत्रकार व आपत्ती  व्यवस्थापन तज्ज्ञ  जयपाल पाटील यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.                    
               
परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा  यांनी  श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार, आ‍काशवाणी दिल्लीच्या क्रीडा विभागाचे प्रोग्राम एक्जीक्युटीव्ह नितीश अरोडा यावेळी उपस्थित होते.
           
दिल्ली आयआयटी  परिसरात  24 ते 27 नोव्हेंबर 2021 दरम्यान आयोजित 5व्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेत श्री. पाटील सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या या परिषदेत श्री. पाटील यांनी  ‘होफफुल टुमारो’ या विषयावर शोध निबंध सादर केला. या परिषदेत सादर केलेल्या शोध निबंधाविषयी  त्यांनी यावेळी माहिती  दिली  व अनुभव कथन केले.
            
श्री. पाटील यांनी यावेळी ‘कोविडोत्तर  जीवनशैली’ विषयावर कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आहार-विहार, व्यायाम आदिंचा अवलंब करण्यासोबतच टेरेस गार्डन फुलविण्याचा तसेच पाणी  बचतीचा  मंत्रही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.