अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चिंतारेव, कुर्ता गांवात जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा दौरा.

इंद्रावती नदीच्या मधोमध वसलेला कुर्ता गांवात नावेने (डोंग्यानी) प्रवास करावे लागते.
दिक्षा झाडे-  तालुका प्रतिनिधी एटापल्ली
अहेरी :- अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असलेल्या गावातील नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करून देऊन विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्याच्या दूरदृष्टी बाळगुन  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ग्रामीण परिसरात जाऊन समस्या जाणून घेत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक ग्रामीण भागात दौरे करून समस्यांचे निराकरण करत आहेत.
            
महाराष्ट्र व छत्तीसगढ़ सीमेवरील गडचिरोली जिल्हातील शेवटच्या टोकावर असलेले अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या चिंतारेव गाव हा इंद्रावती नदीच्या काठावर वसलेले आहे.
         
तर कुर्ता हे गाव इंद्रावती नदीच्या मधोमध म्हणजे इंद्रावती नदीच्या पाण्याच्या प्रवाह सदर गावाजवळ दोन दिशांनी वाहत असुन मधोमध बेट निर्माण झाले आहे. याठिकाणी सहा कुटुंब पारंपरिक शेती करत उदरनिर्वाह करत असुन परिस्थिती मात्र जीवघेणा आहे. सदर कुर्ता गांवात जाण्यासाठी नदीतून नावानी (डोंग्या) प्रवास करून जावे लागते. मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी दामरंचा गावाच्या दौऱ्यात सदर गांवाबाबत दामरंचा येतील नागरिकांनी सांगितले होते. त्यामुळे सदर कुर्ता गांवात भेट देवून समस्या जाणून घेतले आहे. अतिसंवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वांतत्रच्या ७२ वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही. या भागात अनेक प्रमुख समस्या उभे आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत, पुल, विज नाहीत. पिण्याचं पाण्याचा समस्या मात्र याकडे लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष केले असल्याने अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
           
स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असतात. मात्र श्री अजयभाऊ कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत कि त्यांनी आमच्या गांवात येऊन आमचे  समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केले.
          
नागरिकांसोबत एक तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिले. कुर्ता गावातील सहा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तु वाटप केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
       
यावेळी पंचायत समितिचे सभापती श्री.भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम, प.स.माजी सभापती तथा प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम, दामरंचाचे सरपंचा सौ.किरण कोडापे, कमलापूरचे सरपंच श्री श्रीनिवास पेंदाम, ग्राम पंचायत सदस्य श्री.सम्मा कुरसाम, माजी सरपंच श्री.जिलकरशाह मडावी, सुदीप रंगूवार, प्रमोद कोडापे, नरेश मडावी, कार्तिक अल्लाडवार, उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.