पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्पविकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०१: महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त केला. पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सहपालकमंत्री पुढे म्हणाले की, एकेकाळी विकासापासून दूर असलेला गडचिरोली जिल्हा आज परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माओवादावर प्रभावी नियंत्रण मिळवत जिल्ह्यात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण, अटक आणि कारवायांमुळे माओवाद्यांचा प्रभाव कमी झाला असून पोलीस मदत केंद्रांच्या स्थापनेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमातून लाखो नागरिकांना विविध योजनांचा लाभ ...

महिला सक्षमीकरणाला चालना देणारा ‘आदिशा’ प्रकल्प गेम चेंजर ठरेल – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

इमेज
फिरत्या निधीतून आर्थिक साखळी निर्माण गडचिरोली, (जिमाका) दि.३०: महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल, असा विश्वास सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा खाणीकर्म अधिकारी इमरान शेख, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे आदी उपस्थित होते. आदिशा प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना व्यवसायासाठी एक लाख रुपये फिरता निधी केवळ २ टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी खनीज निधीतून तीन कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सध्या ३५० महिलांना हा निधी देण्यात येत आहे. ही रक्कम दोन वर्षांच्या कालावधीत परतफेड करायची असून, परतफेडीतून उपलब्ध होणारी रक्कम पुन्हा इतर महिलांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाचा निधी न संपता सातत्याने वाढत राहून अधिकाधिक महिलांपर्यंत प...

सामूहिक वनहक्क जमिनीचा उत्पादनक्षम वापर वाढवा;

इमेज
विशेष निधी व सूक्ष्म नियोजनाची गरज — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल महिला बचत गटांना संधी, बांबूसह विविध उत्पन्न स्रोतांवर भर; हक्क व कर्तव्यांबाबत जनजागृतीचे निर्देश गडचिरोली, (जिमाका) दि.३०: गडचिरोली जिल्ह्यात सुमारे पाच लाख १६ हजार हेक्टर सामूहिक वनहक्काची जमीन उपलब्ध असून या जमिनीची पूर्ण क्षमता वापरात आणून शेतकऱ्यांना व जिल्ह्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करून उत्पादनाचे नोंदवही (रेकॉर्ड) व्यवस्थित ठेवणे, तसेच विविध उत्पन्न स्रोतांचा विस्तार करण्यासाठी सूक्ष्म पातळीवर चाचपणी करण्याच्या सूचना वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक वनहक्क दाव्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे तसेच वनविभागाचे इतर...

शेतकऱ्यांचे मॅपिंग करून अर्जाशिवाय योजनांचा लाभ देण्याचे धोरण राबवा” : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

इमेज
खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी आढावा बैठक; नैसर्गिक शेती, पारदर्शक अंमलबजावणी आणि सिंचनाला प्राधान्य गडचिरोली, (जिमाका) दि.३०: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा, अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मांडली. यासोबतच बोअरवेल मंजुरीतील दिरंगाई दूर करून प्रकरणे केवळ १५ मिनिटांत मंजूर करण्याचे निर्देश देत त्यांनी प्रशासनाला सजग केले. सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  बैठकीत खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, कीडनियंत्रण, सिंचन सुविधा, पाणी नियोजन तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर आढावा ...

जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार २०२०-२१ करीता प्रस्ताव आमंत्रीत

गडचिरोली, (जिमाका) दि.३०: महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू सन २०२०-२१ या वर्षातील पुरस्कार वितरीत करावयाचा आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम रु. १०,०००/- असे आहे. त्या अनुषंगाने सन २०२०-२१ च्या पुरस्कारासाठी या कार्यालयामार्फत बंद लिफाफ्यात विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.  पुरस्काराचे निकष : (१) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे, (२) क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची ३५ वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल, (३) दिव्यांग खेळाडू व गुणवंत ख...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत

इमेज
जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि.३०: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील दारीद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन १०० टक्के अनूदानावर उपलब्ध करून द्यावयाची आहे. सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करून द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा ७/१२, जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना ८-अ), जमीन मोजणी “क” प्रत, गाव नकाशा, रु. १०० च्या स्टँम्पपेपरवर शपथपत्र इत्यादी माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. तसेच शासन निर्णय दिनांक १४ ऑगस्ट २०१८ नूसार जमीन खरेदीबाबतची कार्यवाही करण्यात येईल. अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.

शेतकऱ्यांचे मॅपिंग करून अर्जाशिवाय योजनांचा लाभ देण्याचे धोरण राबवा” : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

इमेज
खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी आढावा बैठक; नैसर्गिक शेती, पारदर्शक अंमलबजावणी आणि सिंचनाला प्राधान्य गडचिरोली, (जिमाका) दि.३०: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा, अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मांडली. यासोबतच बोअरवेल मंजुरीतील दिरंगाई दूर करून प्रकरणे केवळ १५ मिनिटांत मंजूर करण्याचे निर्देश देत त्यांनी प्रशासनाला सजग केले. सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, कीडनियंत्रण, सिंचन सुविधा, पाणी नियोजन तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर आढावा घेण्य...