जिल्ह्यात कलम ३७ (१)(३) अन्वये मनाई आदेश जारी
गडचिरोली, (जिमाका) दि.२७: जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांकडून आपआपले सोईनुसार विविध ठिकाणी विनापरवाना थोर महापुरुषांचे पुतळयांचे अनावरण करण्यात येत असल्याचे घटना घडून येत आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन समाजामध्ये थोर पुरुषांचे पुतळे बसविणे अनावरण करणे या कारणावरुन तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ३०.०५.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक १३.०६.२०२६ चे २४.०० वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक ३०.०५.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक १३.०६.२०२६ चे...