एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.


एटापल्ली (२ ऑगस्ट) :
एटापल्ली ते वांगेतुरी या मार्गावर सध्या राज्य परिवहन महामंडळाची बसफेरी सुरू आहे. या फेरीमुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र वांगेतुरी नंतरच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अजूनही बस सुविधे अभावी त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मेढरी हे गाव छत्तीसगड सीमेवरील शेवटचा टोकावर असून, बसफेरी त्या गावापर्यंत  पोहचल्यास आदिवासी भावांना मोठा दिलासा मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अहेरी आगार प्रमुखांना निवेदन सादर करण्यात आले. असून या निवेदनात म्हटले आहे की एटापल्ली–वांगेतुरी बसफेरी दररोज किमान एक वेळेस मेढरी गावापर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली. आहे.निवेदन देताना भाकपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार यांच्या सोबत भाकपा तालुका सहसचिव कॉ. विशाल पूज्जलवार आणि किसान सभा तालुका उपाध्यक्ष सत्तू हेडो उपस्थित होते..
कॉ. सुरज जक्कुलवार यांनी सांगितले की,
मेढरीसह परिसरातील गावांमध्ये राहणारे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि स्थानिक जनता बँक व इतर शासकीय कामाकरिता एटापल्ली ये  जा करावा लागते यांना बस सुविधा अभावी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. बसफेरी मेढरी गावापर्यंत पर्यंत वाढल्यास या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळेल.

भाकपाने इशारा दिला आहे की, 
जर ही मागणी तातडीने पूर्ण केली नाही, तर स्थानिक जनतेच्या सहकार्याने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा या वेळी निवेदनात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.