क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आत्मसाद करा, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन.
अहेरी : - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रंजल्या गंजल्या समाजासाठी आणि मुख्यतः स्त्रियांच्या उन्नतीसाठी सर्वस्वी अर्पण केले असून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसाद करावे असे प्रतिपादन जि.प माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. अहेरी नजीकच्या नागेपल्ली येथे शनिवार 28 नोव्हेंबर रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य आपले विचार प्रकट करतांना बोलत होते.
पुढे जि.प माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी म्हणाले की फुले होते म्हणून मुली घडले. त्यांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणूक व प्रेरणेने महिला उत्तुंग व अक्षरशः आकाशात भरारी घेत आहेत. तसेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी फुले दांम्पत्य सर्वस्वी अर्पण केले असून या थोर महापुरुषांचे विचार आत्मसाद करून त्या दिशेने वाटचाल करावे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
तत्पूर्वी माजी जि.प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृति पुतळ्या समोर अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रामुख्याने नागेपल्ली ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच मलरेड्डी येमनुरवार, कांचनलाल वासनिक, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, गणपती गुरुनूले, सविता गुरुनूले, हर्षाली दलाई, ज्योती ठाकरे, किशोर रापेल्लीवार, श्रीनिवास विरगोनवार, वसंत निकुडे, प्रेमदासजी गुरुनुले, मुकत्यार पठाण, धर्माजी गुरुनूले, चंद्रकला ठाकरे, हसन पठाण, सारंग सवरंगपती, श्रीनिवास कोटरंगे, आदी नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा